पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
पुढील आठवड्यात महाकर्जमुक्ती लाभ वाटपाला होणार प्रारंभ. ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमुक्तीपलीकडे शाश्वत शेतीचा शासनाचा व्यापक आराखडा. सिंधुदुर्गनगरी, (ऋषिकेश मोरजकर) : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्ष लाभ वितरणास सुरुवात होणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने दिलेल्या सूचनांची प्रत्येक जिल्हा प्रशासनामार्फत काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे.             राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यासाठी सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राला आर्थिक स्थैर्य प्रदान करणे, शेतकऱ्यांना नव्याने कर्जपात्र बनविणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.             दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर तसेच हवामानातील अनिश्चिततेमुळे राज्यातील शेतकरी वारंवार आर्थिक संकटां...

सिंधुदुर्ग today

इमेज
'ॲड. देवदत्त परुळेकर लिखित 'आजच्या काळासाठी तुकोबा' ग्रंथावर मालवणात ५ रोजी परिसंवाद डॉ. राजन गवस, डॉ.नंदकुमार मोरे, डॉ.गोविंद काजरेकर,प्रा.संजीवनी पाटील आदी अभ्यासकांचा सहभाग. समाज साहित्य प्रतिष्ठान - बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे कार्यक्रमाचे आयोजन. कणकवली / प्रतिनिधी समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ह.भ.प. ॲड. देवदत्त परुळेकर लिखित व प्रभा प्रकाशन, कणकवली प्रकाशित 'आजच्या काळासाठी तुकोबा' या ग्रंथावर रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात शिवाजी विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख आणि संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, समीक्षक-कवी प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर आणि समीक्षक तथा ‘प्रभा साहित्य मैफल’ या साहित्यिक नियतकालिकाच्या संपादक प्रा. संजीवनी पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.           ...

सिंधुदुर्ग today

इमेज
झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या विरोधातील अविश्वास ठराव कायम जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा निर्णय कणकवली / प्रतिनिधी थेट निवडणूकीतून सरपंचपदी निवडून आलेल्या कुडाळ तालुक्यातील झाराप सरपंच दक्षता दशरथ मेस्त्री यांच्यावर सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूरीनंतर ग्रामसभेनेही ठराव मंजूर केला होता. त्याविरूद्ध दक्षता मेस्त्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेला विवाद अर्ज फेटाळत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसभेने मंजूर केलेला अविश्वास ठराव कायम केला आहे. अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या आठ ग्रामपंचायत सदस्यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. दक्षता मेस्त्री या सन २०२२ मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मनमानी, एकतर्फी कार्यपद्धतीच्याविरोधात नऊ सदस्यांपैकी उपसरपंच मंगेश गांवकर, तनया मांजरेकर, प्रियांका रेडकर, अमृता हरमळकर, संजिवनी पेंडूरकर, विजय हरमळकर, अश्पाक कुडाळकर व विशाखा गोडे या आठ सदस्यांनी तहसिलदार कुडाळ यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला. त्यावर १० एप्रिल रोजी तहसिलदारांनी विशेष सभा आयोजित केली होती. यावेळी हा ठराव आठ विरूद्ध दोन मतांनी...