सिंधुदुर्ग today
महावितरणच्या निष्क्रिय कारभाराविरोधात उद्या कणकवली येथे “गरमागरम चाय पे चर्चा” कणकवली (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या वीज समस्यांमुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी आता थेट महावितरण अधिकाऱ्यांनाच जाब विचारण्याचा निर्धार केला असून, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, कणकवली तालुका व्यापारी संघटना आणि कणकवली तालुका वीज ग्राहक संघटना यांच्या संयुक्त पुढाकारातून उद्या शुक्रवार दिनांक २९ मे २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत महावितरण कार्यकारी अभियंता, कणकवली यांच्या केबिनमध्ये “गरमागरम चाय पे चर्चा” हा अभिनव पण तितकाच आक्रमक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. मालवण, देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील तब्बल १ लाख ७५ हजारांहून अधिक अन्यायग्रस्त वीज ग्राहकांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, आगामी पावसाळ्यात दर्जेदार, सुरळीत आणि २४ तास अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी थेट अधिकाऱ्यांशी चर्चा करत नागरिक आपल्या संतप्त भावना व्यक्त करणार आहेत. महावितरण कंपनीकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब व सर्वसामान्य वीज ग्राहकांची सातत्याने आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप संघटना...