पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
छेड काढल्याप्रकरणी "त्या" परप्रांतीय युवकांना सशर्थ जामीन अँड उमेश सावंत यांनी पाहीले काम. कणकवली : प्रतिनिधी  शहरात दोन अल्पवयीन युवतींचा पाठलाग करून त्यांची छेड काढल्याप्रकरणी 'पोक्सो'सह भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार दाखल गुन्हयातील संशयित बंटी सुखविंदर गिल (२२) आणि हरप्रीत मलखीत सिंग (२५) दोघेही रा. पंजाब, यांना विशेष न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला. संशयितांच्यावतीने ॲड.  उमेश सावंत यांनी काम पाहिले. शहरातील परी हेअर अँड ब्युटी सलूनमध्ये मूळ पंजाब राज्यामधील सदरचे दोन युबक कामाला होते. पीडित युवती आणि तिची बहीण रस्त्याने चालत जात असताना या दोन्ही संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. एवढचावरच न थांबता संशयितांनी पीडित युवतीचा हात धरून ओढला आणि मनात लज्जा उत्पन्न होईल, असे अश्लील वर्तन केले. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने आपल्या कुटुंबियांना माहिती दिली. पीडितेच्या तक्रारीवरून कणकवली पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण करण्याचे अधिनियम (पोक्सो) कलम ८ आणि १...

सिंधुदुर्ग today

इमेज
कोळोशी गावठण येथे पाणी टंचाई ; ग्रामस्थांनी घागर घेऊन ग्रा.पं. ला दिले निवेदन. काय पाहिजे... पाणी पाहिजे...कोण देणार... ग्रामपंचायत देणार ; घोषणांनी परिसर गेला दुमदुमून. कणकवली प्रतिनिधी         पाणी पुरवठा सुरळीत करा...नाहितर खुर्ची खाली करा..काय पाहिजे... पाणी पाहिजे...कोण देणार... ग्रामपंचायत देणार ... पाण्याविना जनता त्रस्त. घोषणांनी कोळोशी परिसर दुमदुमून गेला.      कोळोशी गावठण येथील नागरिकांनी ग्रामपंचायत कोळोशीच्या कार्यालयात घागर मोर्चा काढत सरपंचांना जाब विचारला.यावेळी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आज पासून पंधरा दिवसांच्या आत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.       गेल्या काही दिवसांपासून कोळोशी गावठण येथील नळधारकांना  नळयोजनचा पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज ग्रामपंचायत कोळोशी येथे घागर मोर्चा नेऊन सरपंच गुरुनाथ आचरेकर यांना निवेदन देऊन जाब विचारला.यावेळी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आपण यासाठी पंधरा दिवसांच्या आत कटाक्षाने लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी...

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे ग्रामस्थांनी परप्रांतीयांना जमीन न विक्री करण्याची घेतली शपथ. गावच्या विकासासाठी असलदे ग्रामविकास समितीची स्थापना ; कमिटीच्या अध्यक्षपदी मानकरी उदय परब यांची निवड. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील असलदे गावामध्ये परप्रांतीयांना जमीन विक्री होवू नये , या  पार्श्वभूमीवर गावाची संस्कृती, पर्यावरण, पारंपरिक शेती आणि सामाजिक एकात्मता अबाधित राखण्यासाठी जमीन विक्रीस बंदी करण्याचा निर्णय गावसभेने घेतला होता. त्यानुसार संभाव्य नियमावली तयार करण्यात आली आहे. गावाच्या सर्वांगीण हितासाठी , पर्यावरण रक्षणासाठी गावातील मानकरी मंडळी व प्रतिष्ठित नागरिकांनी  पुढाकार घेत पुन्हा घेतलेल्या बैठकीत गावातील ग्रामस्थांनी परप्रांतीयांना जमीन न विक्री करण्याचा एल्गार करत ग्रामदेवता श्री देव रामेश्वर पावणादेवीला समोर ठेवून शपथ घेतली. या बैठकीत असलदे गावच्या हितासाठी असलदे ग्रामविकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी गावचे मानकरी उदय परब यांची निवड एकमताने करण्यात आली.  असलदे श्री देव रामेश्वर पावणादेवी चव्हाटा येथे सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या अध्यक्...

सिंधुदुर्ग today

इमेज
‘हरित प्रशासन’कडे सिंधुदुर्गची वाटचाल. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील ; इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन. सिंधुदुर्गनगरी  (ऋषिकेश मोरजकर)  पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार यांना प्राधान्य देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमामुळे जिल्हा प्रशासनाने ‘हरित प्रशासन’च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल टाकले आहे. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या इलेक्ट्रिकल वाहनाचे प्रत्यक्ष चार्जिंग करून या सुविधेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणपूरक विकासाची गरज अधोरेखित केली. वाढते प्रदूषण आणि इंधनाच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर ह...

सिंधुदुर्ग today

इमेज
आता पालकमंत्री राहणार सिंधू रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष. सिंधु रत्न योजनेला मुख्यमंत्र्यांनी संजीवनी देत रोजगार,जल, सागरी आणि सर्वांगीण विकासाला दिली चालना ! सिंधुनगरी (ऋषिकेश मोरजकर)  सिंधु - रत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने मंत्री मंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या सिंधु रत्न योजनेच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे पदसिद्ध पालकमंत्री अध्यक्ष राहतील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तर उपाध्यक्ष पण हे मुख्यमंत्री नियुक्त असेल. या समितीच्या सदस्य पदी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश असेल.        सिंधु रत्न योजनेसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकास कामाला गती देण्यासाठी ही योजना दिली आहे, त्यातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जिल्ह्यातून स्वागत होत आहे. पर्यटन ठिकाणी सुविधा विषयक कामे, जल पर्यटन, सागरी पर्यटन,रोजगार निर्म...

सिंधुदुर्ग today

इमेज
ग्रामीण भागातील शाळांना दिलासा; २० विद्यार्थ्यांवर ३ शिक्षकांना मान्यता. पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.  राज्य सरकारने क्रांतिकारी निर्णय घेत  शिक्षण क्षेत्रात टाकले पुढचे पाऊल. शिक्षण मंत्री दादा भुसे,यांच्या समवेत उद्योग मंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या बैठकांना आले यश. सिंधुनगरी (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग सह कोकण अशा ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना जाचक ठरणारा पटसंख्येचा निकष बदलणारा क्रांतिकारी निर्णय सिंधुदुर्ग चे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या ठाम भूमिकेमुळे शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व कोकणातील आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयावर अखेर या निर्णयामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग कोकण सह दुर्गम भागातील शाळांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.            ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनाने सन २०२५-२६ च्या सं...

सिंधुदुर्ग today

इमेज
हिंदु म्हणून जिहादी मनोवृत्तीला ठोकुन काढले पाहीजे- अभय जगताप.  नांदगाव येथे विशाल हिंदू संमेलन उत्साहात : हिंदूची संस्कृती, परंपरा राखण्याचे काम आपण सर्वांनी करायला पाहीजे. कणकवली : प्रतिनिधी  हिंदू धर्माला अनेक वर्षाची परंपरा आणि संस्कृती लाभलेली आहे. मात्र एकप्रकारे आपल्यातील काही लोक सोबत घेवुन आपली संस्कृती संपविण्याचा प्रयत्न विघातक शक्ती करत आहे. ज्यापद्धतीने लव जिहादच्या माध्यमातुन धर्मांतराचे प्रयत्न वाढलेले आहेत. तसेच लॅण्ड जिहाद देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यापलिकडे जावुन वोट जिहाद हा प्रकार नव्याने सुरु झालेला आहे. सरकारच्या धोरणानुसार हम दो..हमारे दो.. जसे हिंदूना लागु आहे. त्याप्रमाणे अन्य धर्मियांना देखील हा कायदा लागु करण्यासाठी आपण लढा उभारला पाहीजे.  हिंदूची संस्कृती, परंपरा राखण्याचे काम आपण सर्वांनी करायला पाहीजे. जिहादी मनोवृत्तीला सर्वांनी एकत्र येवुन ठोकुन काढले पाहीजे, असे आवाहन  शिवशंभु विचारमंच कोकण प्रांत संयोजक अभय जगताप यांनी केले. सकल हिंदू समाजाच्यावतीने नांदगाव येथे विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन वाघाचीवाडी येथे सभागृहात करण्यात आले ...