सिंधुदुर्ग today
सुशांत दळवी खूनप्रकरणी सखोल तपासाची मागणी.! कळसुली ग्रामस्थांचे पालकमंत्री नाम. नितेश राणेंना निवेदन.! पोलिसांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना ; असतील तेवढे आरोपी जेरबंद होतील.! पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला विश्वास.! कणकवली : प्रतिनिधी बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांच्या निर्घृण खूनप्रकरणी सखोल व निष्पक्ष तपास करून मुख्य आरोपींना अटक करावी, अशी मागणी कळसुली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २७ मार्च रोजी कणकवली येथे सुशांत दळवी यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असली, तरी खुनाची पद्धत व स्वरूप पाहता हे कृत्य एकट्या व्यक्तीकडून झालेले नसून यात इतरही काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अटक करण्यात आलेल्या आरोपीची शारीरिक स्थिती लक्षात घेता त्याच्याकडून एकट्याने असे कृत्य होणे संशयास्पद असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. तसेच, मुख्य सूत्रधारांनी पोल...