सिंधुदुर्ग today
कोळोशी गावठण येथे पाणी टंचाई ; ग्रामस्थांनी घागर घेऊन ग्रा.पं. ला दिले निवेदन. काय पाहिजे... पाणी पाहिजे...कोण देणार... ग्रामपंचायत देणार ; घोषणांनी परिसर गेला दुमदुमून. कणकवली प्रतिनिधी पाणी पुरवठा सुरळीत करा...नाहितर खुर्ची खाली करा..काय पाहिजे... पाणी पाहिजे...कोण देणार... ग्रामपंचायत देणार ... पाण्याविना जनता त्रस्त. घोषणांनी कोळोशी परिसर दुमदुमून गेला. कोळोशी गावठण येथील नागरिकांनी ग्रामपंचायत कोळोशीच्या कार्यालयात घागर मोर्चा काढत सरपंचांना जाब विचारला.यावेळी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आज पासून पंधरा दिवसांच्या आत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. गेल्या काही दिवसांपासून कोळोशी गावठण येथील नळधारकांना नळयोजनचा पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज ग्रामपंचायत कोळोशी येथे घागर मोर्चा नेऊन सरपंच गुरुनाथ आचरेकर यांना निवेदन देऊन जाब विचारला.यावेळी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आपण यासाठी पंधरा दिवसांच्या आत कटाक्षाने लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी...