सिंधुदुर्ग today
मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय : पालकमंत्री नितेश राणे. राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित! मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत काँग्रेसवर घणाघात. धार्मिक स्थळांच्या विकासासह जागतिक पातळीवर भारताचा डंका. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या निर्णय आणि परिवर्तनाचा लेखाजोखा मांडला. २०१४ पूर्वी देशात असलेल्या असुरक्षिततेच्या वातावरणातून मोदींनी देशाला बाहेर काढत जागतिक पातळीवर सर्वात सुरक्षित राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वाधिक काळ पंतप्रधान होण्याचा मान मिळवणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाखाली देश आता अमेरिका, चीननंतर तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक आणि सामरिक महाशक्ती बनत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशात तुष्टीकरणाच्या राजका...