सिंधुदुर्ग today
सुधारित पीक विमा योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी ३१ जुलै पूर्वी लाभ घ्यावा शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक पीक विमा काढल्यानंतर ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे. कणकवली प्रतिनिधी राज्यात २०२६- २७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू झाली असून, भात शेती उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांनी केले आहे पत्रकात श्री. अर्जुन जाधव यांनी म्हटले आहे की. राज्यात २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सधारित प्रधानमंत्र पीक विमा योजना ३ जुलैपासून लागृ केली आहे. यामळे अधिसचित महसूल मंडळात, अधिसूचित पिकाचे चाल वर्षीाचे सरासरी उत्पादन हे उंबरठ उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास विमा नुकसान भरपाई" लागू होणार आहे. भात व नागली पिकांसाठी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के विमा हप्ता भरून सहभाग घ्यावा लागेल. अंतिम तारीख ३१ जुलै आहे. केंद्राच्या पीक विमा पोर्टल व' ऑनलाईन सहभाग नोंदविता येईल. यात बँक, कॉमन सर्विस सेंटर, किंवा स्वतः शेतकरी...