सिंधुदुर्ग today
बदलत्या काळातही वृत्तपत्रांचे महत्त्व वाढत चालले आहे - पालकमंत्री नितेश राणे कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा ; दर तीन महिन्याला पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेणार ,पालकमंत्र्यांचे अभिवच कणकवली : प्रतिनिधी आताच्या बदलत्या काळात वृत्तपत्र , सोशल मिडीया - युट्युब चॅनेल , वृत्तवाहिन्या अशा तीन विभागांत ही पत्रकारिता विभागली गेली आहे. वाचक म्हणून आणि एक राजकीय पक्षाचा समाजात काम करणारा कार्यकर्ता म्हणून तर माझ्या दृष्टीने सर्वात जास्त विश्वासार्हता म्हणून पत्रकारिता ही वृत्तपत्रांची आहे. पत्रकारितेत आपले सिध्दांत बाजूला ठेवू नका. कणकवली तालुक्यातील पत्रकारसंघाचे कार्य उल्लेखनीय आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके व त्यांची टीम विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवित आहे. पत्रकार म्हणून ब-याच पत्रकारांचा नेहमी आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. वृत्तपत्रात सर्वात जास्त विश्वासार्हता असलेली पत्रकारिता आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दर तीन महिन्याला विशेष आरोग्य शिबिर आयोजित केले जाईल. तसेच ओऱोस येथे दर्पण गृहनिर्माण संस...