पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
पुढील आठवड्यात महाकर्जमुक्ती लाभ वाटपाला होणार प्रारंभ. ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमुक्तीपलीकडे शाश्वत शेतीचा शासनाचा व्यापक आराखडा. सिंधुदुर्गनगरी, (ऋषिकेश मोरजकर) : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्ष लाभ वितरणास सुरुवात होणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने दिलेल्या सूचनांची प्रत्येक जिल्हा प्रशासनामार्फत काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे.             राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यासाठी सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राला आर्थिक स्थैर्य प्रदान करणे, शेतकऱ्यांना नव्याने कर्जपात्र बनविणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.             दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर तसेच हवामानातील अनिश्चिततेमुळे राज्यातील शेतकरी वारंवार आर्थिक संकटां...

सिंधुदुर्ग today

इमेज
'ॲड. देवदत्त परुळेकर लिखित 'आजच्या काळासाठी तुकोबा' ग्रंथावर मालवणात ५ रोजी परिसंवाद डॉ. राजन गवस, डॉ.नंदकुमार मोरे, डॉ.गोविंद काजरेकर,प्रा.संजीवनी पाटील आदी अभ्यासकांचा सहभाग. समाज साहित्य प्रतिष्ठान - बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे कार्यक्रमाचे आयोजन. कणकवली / प्रतिनिधी समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ह.भ.प. ॲड. देवदत्त परुळेकर लिखित व प्रभा प्रकाशन, कणकवली प्रकाशित 'आजच्या काळासाठी तुकोबा' या ग्रंथावर रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात शिवाजी विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख आणि संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, समीक्षक-कवी प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर आणि समीक्षक तथा ‘प्रभा साहित्य मैफल’ या साहित्यिक नियतकालिकाच्या संपादक प्रा. संजीवनी पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.           ...

सिंधुदुर्ग today

इमेज
झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या विरोधातील अविश्वास ठराव कायम जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा निर्णय कणकवली / प्रतिनिधी थेट निवडणूकीतून सरपंचपदी निवडून आलेल्या कुडाळ तालुक्यातील झाराप सरपंच दक्षता दशरथ मेस्त्री यांच्यावर सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूरीनंतर ग्रामसभेनेही ठराव मंजूर केला होता. त्याविरूद्ध दक्षता मेस्त्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेला विवाद अर्ज फेटाळत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसभेने मंजूर केलेला अविश्वास ठराव कायम केला आहे. अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या आठ ग्रामपंचायत सदस्यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. दक्षता मेस्त्री या सन २०२२ मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मनमानी, एकतर्फी कार्यपद्धतीच्याविरोधात नऊ सदस्यांपैकी उपसरपंच मंगेश गांवकर, तनया मांजरेकर, प्रियांका रेडकर, अमृता हरमळकर, संजिवनी पेंडूरकर, विजय हरमळकर, अश्पाक कुडाळकर व विशाखा गोडे या आठ सदस्यांनी तहसिलदार कुडाळ यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला. त्यावर १० एप्रिल रोजी तहसिलदारांनी विशेष सभा आयोजित केली होती. यावेळी हा ठराव आठ विरूद्ध दोन मतांनी...

सिंधुदुर्ग today

इमेज
  गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत योजना कणकवली /प्रतिनिधी  गेल्या २० वर्षांपासून दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहे. उत्तम गुणवत्ता आणि शिक्षणाची जिद्द असूनही आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये या उद्देशाने दिशा परिवार समाजातील दानशूर व्यक्ती आणि अशा विद्यार्थ्यांना एकत्र जोडण्याचे कार्य करत आहे. शैक्षणिक मदतीसाठी अटी व पात्रता कला, वाणिज्य, शास्त्र, अभियांत्रिकी ( शासकीय महाविद्यालय) आर्किटेक्चर, कृषी, फार्मसी, नर्सिंग मध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि इ. १२ वी मध्ये ८०% गुण असणाऱ्या गरजू व गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल. इयत्ता १०वी नंतर डिप्लोमासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेणारे गरजू विद्यार्थी अर्ज करू शकतात. सदर मदतीमध्ये कॉलेजची फी, राहणे, जेवणे यासाठी उपलब्ध निधीनुसार मदतीचा विचार केला जाईल. महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थी; ज्यांचे पालक शेत मजूर, अल्प भू धारक, अल्प उत्पन्न धारक आहेत अथवा ज्या विद्यार्थ्यांचे पालक हयात नाहीत अशा विद्यार्थ्यां...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील विजय ज्ञानदेव मोरये यांचे निधन. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव सिसयेवाडी महापुरुष मंडळाचे सभासद उद्योजक विजय ज्ञानदेव मोरये यांचे नुकतेच अल्पशा आजाराने  मुंबई येथील राहत्या घरी निधन झाले आहे ते 76 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने नांदगाव गावातून हळहळ व्यक्त होत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
सावंतवाडीत संशयास्पद फिरणाऱ्या त्या तीन जणांनची पोलिस चौकशी ; जम्मू- कश्मिर ला पाठवले परत.  पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर पोलिसायंत्रणा सतर्क; केली प्रत्येकाची ओळख परेड  जम्मू- कश्मिर मधील तीन जण सावंतवाडीत घरोघरी फिरून मागत होते चंदा. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड.  पोलिसांनी आरधर कार्डावरील पत्त्याची शहानिशा करून फिरविले माघारी. सावंतवाडी : प्रतिनिधी  शहरातील भटवाडी काजरकोंड परिसरात मुस्लिम वेशातील मदतीसाठी पैशांची मागणी करणाऱ्या तीन संशयित नागरिकांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. हिंदुत्ववादी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी त्यांची प्राथमिक चौकशी केले असता ते जम्मू- कश्मिर येथील कुपवाडा जिल्ह्यातील मणीगा शेखपुरा येथील असल्याचे उघड झाले.दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर पोलिसायंत्रणा सतर्क झाली आणि संशयितांची केली ओळख परेड करून त्यांच्या आधारकार्ड वरील पत्ता असलेल्या कुपवाडा जिल्ह्यातील मणीगा येथे पाठवण्याची कार्यवाही पोलिसांनी केली आहे.     ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नाम.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना व दीपोत्सव. कणकवली दि.२४ जून (प्रतिनिधी ) सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीसह राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याच्या विकासासाठी तसेच मत्स्योद्योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल विरोधी पक्षांकडूनही घेतली जात असल्याने त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक व्यक्त होत असल्याचे गजानन उपरकर यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष  राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र मंडळांच्या वतीने परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थान येथे  विशेष प्रार्थना व दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाबांच्या समाधीस्थळी दीपप्रज्वलन करून मंत्री नितेश राणे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या हातून राज्याच्या विकासासाठी अधिकाधिक जनहिताची कामे घडावीत, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर...