पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
कोकणच्या जलप्रवासाचे  नवे पर्व सुरू  मुंबई-विजयदुर्ग 'रो-पॅक्स सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा -मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मेहनतीला आले यश -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनाला चालना -कोकण–मुंबई दुवा होणार अधिक मजबूत; जलसेवेतून विकासाचा महामार्ग -सागरी वाहतुकीत महाराष्ट्राची झेप; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना साकार मुंबई,: प्रतिनिधी  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून केलेल्या आणि  मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-विजयदुर्ग रो-रो जलवाहतूक सेवेचा आज मोठ्या उत्साहात  शुभारंभ सोहळा संपन्न झाला.मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवपूजा करून भाऊचा धक्का, मुंबई येथून या सेवेची पहिली फेरी कोकणच्या दिशेने रवाना झाली. पहिल्या फेरीला मुंबईकर चाकरमानी व पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव मध्ये आठवडा बाजारात स्वच्छतेचा जागर तिठा परिसर केला स्वच्छ नांदगाव : प्रतिनिधी  नांदगाव ग्रामपंचायत च्या सहकार्याने आणि स्वच्छता मिशन,सिंधुदुर्ग च्यावतीने नांदगाव तिठ्ठा बाजारपेठ येथे रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  स्थानिकांसह,लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी, रिक्षा संघटना पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते.नांदगाव तिठ्ठा परीसराची स्वच्छता करीत सर्वांना स्वच्छता संदेश देणारी पत्रके वाटप करीत स्वच्छेचे महत्त्व पटवून देण्यात आले.  सुरुवातीला मिशन सिंधुदुर्ग चे मुख्य स्वच्छता दूत  पत्रकार गणेश जेठे यांनी प्रास्ताविक करताना स्वच्छता मिशन चे काम सांगितले.त्याशिवाय स्वच्छता मोहीम का राबवली जाते याची माहिती दिली.राष्ट्रगीताने स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळेस जि.प.सदस्य संतोष पारकर,पं.स.सदस्य हर्षदा वाळके,सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र सावंत, माजी जि.प.सभापती नागेश मोरये,माजी सरपंच पंढरीनाथ वायंगणकर,वैभववाडी नायब तहसीलदार दिलिप पाटील,वारगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके,प्रा.विनायक पाताडे,नांदगा...

सिंधुदुर्ग today

इमेज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक( रो-रो) सेवेला शुभेच्छा  कोकणवासियांना जलद, आरामदायी व आनंददायी प्रवासाची सुविधा ; मुख्यमंत्र्यांचे ट्विट मंत्री नितेश राणे यांच्या ट्विटला मुख्यमंत्र्यांनी रि ट्विट करत दिल्या शुभेच्छा ऋषिकेश मोरजकर : सिंधुदुर्ग  मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग)  अशी १ मार्चपासून सुरू होणाऱ्या M2M जलवाहतूक रो-रो सेवेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्री नितेश राणे यांच्या  ट्विटला रि ट्विट करत जलसेवेच्या शुभारंभाला शुभेच्छा दिल्या आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे,“मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यान रो-पॅक्स फेरी सेवा १ मार्च २०२६ पासून सुरू होत आहे. यामुळे कोकणवासियांना सागरी मार्गाने जलद, आरामदायी व आनंददायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सेवेद्वारे अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबईहून विजयदुर्ग येथे पोहोचता येणार आहे.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यानची बहुप्रतिक्षित ...

सिंधुदुर्ग today

इमेज
भाषा उच्चशिक्षितांनी संपवली आणि अडाण्यांनी जपली. माझं जगणं माझी भाषा ' व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन. कणकवली/प्रतिनिधी         समाज ज्यांना अडाणी समजतो त्याच वर्गाने जगातील कोणतीही बोलीभाषा जपली आहे. तर उच्चशिक्षित वर्गाने भाषा शुद्धीकरणाच्या नावाखाली प्रमाणभाषेलाच सर्वाधिक महत्त्व दिले. मात्र बोली जपल्या गेल्या तरच प्रमाणभाषा टिकते हे भान या उच्चशिक्षित वर्गाने न जपल्यामुळे उच्चशिक्षित वर्गाने भाषा संपवली या निष्कर्षापर्यंत आपण येऊ शकतो असे स्पष्ट प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर यांनी 'आपलं जगणं आपली भाषा' या व्याख्यानात केले.       मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने रत्नागिरी गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात कवी अजय कांडर यांचे 'माझं जगणं माझी भाषा ' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यानिमित्ताने बोलताना कांडर यांनी जेवढा समाज उच्चशिक्षित आणि श्रीमंत होत जातो तेवढा तो भाषेपासून दूर जात असतो असेही निरीक्षण नोंदविले. यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी विलास कोळपे, प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, उपप्राचार्य श्रीमती आठले, उपप्राचार्य श्रीमती कदम, मराठ...

सिंधुदुर्ग today

इमेज
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे आज शनिवार २८ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर. कणकवली : प्रतिनिधी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवार २८ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे - दुपारी १२.३० वा. मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ०१.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव, दुपारी ०१.२५वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून आकासा एअर QP- 1380 विमानाने गोव्याकडे प्रयाण, दुपारी ०२.३० वा.  मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने वैभववाडीकडे प्रयाण, दुपारी ०४.३० वा. भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटनास उपस्थिती ( श्री. बंड्या मांजरेकर मित्रमंडळ ), सायं. ०६.०० वा. रामेश्वर प्रतिष्ठान, मिठबांव क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनास उपिस्थती ( संदर्भ : श्री. शैलेश लोके ), सायं. ०६.३० वा. मोटारीने मोपा, गोव्याकडे प्रयाण, रात्रौ ०८.३० वा. मनोहर आंत...

सिंधुदुर्ग today

इमेज
  १ मार्च पासून मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा सुरू; मंत्री नितेश राणे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप; पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला मिळणार मोठी चालना. तिकीट बुकिंग च्या माध्यमातून रो-रो सेवेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद  सुरक्षेच्या दृष्टीने सर्व परवानग्या प्राप्त;बोटीत आरोग्य सुविधा असणार उपलब्ध. ऋषिकेश मोरजकर : (सिंधुदुर्ग )  जलवाहतूक (रो - रो )सेवा सुरू करणे, ही संकल्पना मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्या संकल्पनेतूनच  मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणे हा उपक्रम सुरू करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या संकल्पनेला खऱ्या अर्थाने १ मार्च पासून  सुरुवात होत आहे. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई आणि कोकणाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करत आहोत. अशी माहिती मत्स्य  व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळात पत्रकार परिषदेत दिली.     यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले,मुंबई ते विजयदुर्ग हा पहिला  जलमार्ग...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी अजय कांडर यांचे 'माझं जगणं माझी भाषा' विषयावर  २७ रोजी रत्नागिरी येथे व्याख्यान कणकवली/प्रतिनिधी        मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भाषादिन कार्यक्रमात कवी अजय कांडर यांचे माझं जगणं माझी भाषा या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर विषयावरील कवी कांडर यांचे व्याख्यान जळगाव बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह महाराष्ट्राच्या विविध भागात यापूर्वीही आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे कांडर यांना सदर व्याख्यानासाठी मराठी भाषा दिनानिमित्त रत्नागिरी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.      कवी अजय कांडर हे मराठीतील एक प्रसिद्ध कवी, अभ्यासू स्तंभ लेखक आणि व्याख्याते म्हणून सर्वत्र परिचित आहेत. युगानुयुगे तूच ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दीर्घ कविता आणि  महात्मा गांधी यांच्यावरील अजूनही जिवंत आहे गांधी या दोन्ही कविता त्यांच्या बहुचर्चित आहेत. या दोन कवितेच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारावर त्यांची विश...