पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
चांगल्या साहित्याचा निकष पुरस्काराने ठरत नसतो - कवी अजय कांडर. कणकवली महाविद्यालयाच्या लेखन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद. कणकवली/ प्रतिनिधी      चांगल्या कवितेसाठी कवितेचे तंत्र महत्त्वाचं नसून कवितेचा आशय महत्वाचा ठरतो.कवितेचे तंत्र शिकून चांगली कविता लिहिता येत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही चांगल्या साहित्याचा निकष साहित्यिकाला मिळालेल्या पुरस्काराने ठरत नाही. तर चांगला अभिजीत वाचक ज्या साहित्याला मिळतो ते लेखन उत्तम समजावे.यामुळे नव्या कवीनी कोणत्याही प्रकारचं साहित्य लेखन करताना लेखन ही आपल्या अभिव्यक्तीची गरज आहे, या जाणिवेतूनच लेखन करावे असे प्रतिपादन नामवंत कवी आणि प्रसिद्ध स्तंभ लेखक अजय कांडर यांनी येथे केले.      कणकवली महाविद्यालयाच्या कणक नियतकालिक विभागातर्फे कविता ललित आणि कथा साहित्य प्रकाराची कार्यशाळा महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी बोलताना कांडर यांनी कवीचा किंवा लेखकाचा जेवढा व्यक्तिगत संघर्ष तेवढी त्याची उत्तम लेखन करण्याची शक्यता जास्त. सुखशांती जीवन जगून उत्तम लेखन करता येत नाही असेही आग्रहणे सांगितले. म...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली पंचायत समिती चा १ सप्टेंबरला जनता दरबार. सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली होणार जनता  दरबार. विविध खात्याचे अधिकारी राहणार उपस्थित. जनतेच्या समस्या निवारण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत जनतादरबार घेण्याच्या सूचना.  कणकवली  : (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार  नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी कणकवली पंचायत समितीतर्फे १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. हा जनता दरबार कणकवली पंचायत समितीच्या भालचंद्र महाराज सभागृहात सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली होणार  होणार आहे. यावेळी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी  प्रमुख खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तत्काळ कार्यवाही व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात आरोग्य विभाग, एस.टी. महामंडळ, महावितरण , सार्वजनिक बांधकाम वि...

सिंधुदुर्ग today

इमेज
ईद ए मिलाद निमित्त नांदगाव खालची मुस्लिम वाडी येथील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप.  नांदगाव प्रतिनिधी  नांदगाव येथे ईद ए मिलादुनबबी जलसा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नांदगाव खालची मुस्लिम वाडी येथील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.    दरवर्षी प्रमाणे यंदाही नांदगाव येथे ईद ए मिलादुनबबी जलसा मुबारक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दोस्ताना ग्रुप नांदगाव तर्फे खालची मुस्लिम वाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना पाटी, पेन्सिल ,वह्या ,पेन ,पट्टी इत्यादी वस्तू वाटप करण्यात आले.       यावेळी मौलाना हसनेन जानी, गवस साठविलकर, आदम साठविलकर, माजी सैनिक अबुबक्कर नावलेकर,तोसीम नावलेकर,कादर साटविलकर , मुबारक साटविलकर, अलताज साटविलकर इमाम नाचरे, मैनुद्दीन नावलेकर, सलीम साठविलकर, असलम पाटणकर, अल्ताज साठविलकर, कादर साठविलकर अकिब नाचरे ,आलम साठविलकर आदी उपस्थित होते. तसेच दुपारनंतर मशिदीमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे ईद ए मिलादुनबबी जलसा मोठ्या उत्साहात. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) नांदगाव येथे ईद ए मिलादुनबबी जलसा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .दरवर्षी प्रमाणे यंदाही नांदगाव येथे ईद ए मिलादुनबबी जलसा मुबारक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी नांदगाव तिठा गौसिया मस्जिद व खालची मुस्लिम वाडी गौसिया मस्जिद येथून मिरवणूक काढण्यात आली या "वेळी नारे तकबिर अलाहो अकबर;नारे रिसालत या रसुलुला ;ईद ए मिलादुनबबी जलसा मुबारक; हिंदुस्थान जिंदाबाद असे घोषना देण्यात आल्या    या वेळी पैगंबर जन्म दिनानिमित्त मुस्लिम मोहलयात प्रत्येक घरात विद्युत रोषणाई करण्यात आली दोन्ही गौसिया मस्जिद मध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली मिरवणूकीत प्रत्येकाने सरबत;सिरखुरमा; लाडू; मिठाई; जिलेबी; पाणी बाॅटल;समुसे;वडे; असे अनेक पदार्थ पैगंबर जन्म दिनानिमित्त वाटण्यात आले संपुर्ण मुस्लिम मोहला आनंदाने ईद ए मिलादुनबबी जलसा मुबारक साजरा करण्यात आला    या वेळी पैगंबर जन्म दिनानिमित्ताने कासारडे बिट अंमलदार झोरे साहेब; नांदगाव सरपंच रविराज मोरजकर असलदे सरपंच चंद्रकांत डामरे नांदगाव पोलिस पाटील वॄक्षाली मोरज...

सिंधुदुर्ग today

इमेज
महाराष्ट्रातील मच्छीमारांना डिझेल दरात सवलतीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची दिल्लीत भेट!  खासदार नारायण राणे, राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे, आम.निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने गेली भेट.  राज्यातील मच्छीमारांना दिलासा मिळवून देण्याचा मंत्री नितेश राणे यांचा प्रयत्न. कोकणासह राज्यातील मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी शिष्टमंडळात झाले होते सहभागी. सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर) नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या ज्वलंत प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारकडे निर्णायक पाठपुरावा सुरू झाला आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांची नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या समवेत भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील यांत्रिक मासेमारी नौका तसेच मच्छीमार सहकारी संस्थांना प्रचलित किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी कोकणासह राज्यातील मच्छीमार संस्थांचे एक शिष्टमंडळ उपस्थित होते.      ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव शाळा नं.१, उर्दु शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप. प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने उपक्रम; पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांचा पुढाकार कणकवली : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने आणि यांच्या पुढाकाराने नांदगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार  नांदगाव शाळा नं. 1, उर्दु शाळा येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  नांदगाव गावातील  नांदगाव शाळा नं. 1, उर्दु शाळा या शाळांमघ्ये मंगळवारी मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.यावेळी  कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके नांदगाव सरपंच रविराज मोरजकर , उपसरपंच इरफान साटविलकर , माजी उपसरपंच निरज मोरये, मारुती मोरये ,रज्जाक बटवाले, पत्रकार ऋषिकेश मोरजकर ,रघुनाथ लोके, प्रवीण डगरे, महेश लोके, गोविंद लोके, पंकज आचरेकर, मनोज...

सिंधुदुर्ग today

इमेज
संध्या सामंत सावंत यांचा लोकमत सखी जनसेवा पुरस्काराने गौरव. सामाजिक कार्याच्या योगदानाची दखल. कणकवली / प्रतिनिधी      मूळच्या झाराप येथील आणि सध्या ठाण्यात कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका संध्या सामंत-सावंत यांना 'लोकमत सखी जनसेविका सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.      त्या गेली १५ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून २०१८ मध्ये त्यांनी मातृसेवा फाउंडेशनची स्थापना केली. महिला, बालविकास, शिक्षण, स्वावलंबन आणि सक्षमीकरण या क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. ठाणे ते सिंधुदुर्गातील वंचित मुलांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवणे, तसेच महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम त्या करतात. त्यांच्या प्रयत्नातून ठाणे पाचवड आदिवासी भागातील ३०हून अधिक आदिवासी महिला साक्षर झाल्या असून घरकाम करणाऱ्या महिला, पोलीस महिला आणि रेड लाईट एरियामधील महिलांसाठीही त्यांनी भरीव योगदान दिले आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक शिक्षणापासून वंचित मुलांना त्यांनी शिक्षण प्रवाहात आणले आहे.लोकमत समूहाच्या 'सखी मंच'द्वारे समाजसेवा आणि व...