सिंधुदुर्ग today
देश विघातक शक्तीना रोखण्याची आणि राष्ट्र सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाण्यासाठी तरुण पिढीला प्रबोधनाची गरज- मंत्री नितेश राणे. नांदगाव येथील भारुड महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) देश विघातक शक्तीना रोखण्याची आणि राष्ट्र सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाण्यासाठी तरुण पिढीला प्रबोधनाची गरज आहे आणि गरज भारुड मोहत्सवातून व भजनाच्या माध्यमातून पूर्णत्वास जाईल. तरुण पिढीला दिशा देण्याचे काम अशा उपक्रमातून होईल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथे कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवली आयोजित हिंदू जनजागृती भारुड महोत्सव २०२६ चा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी पालकमंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर,कणकवली सभापती सौ. हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, मनोज रावराणे,कलाकार समिती जिल्हा अध्यक्ष संतोष कानडे,भजन समितीचे अध्यक्ष प्रकाश पारकर बु...