पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
एआय माहिती देईल पण जगण्याला दिशा देऊ शकत नाही - अजय कांडर. आचरा ज्युनिअर कॉलेज पारितोषिक सोहळा आणि ग्रंथालय उद्घघाटन समारंभ. आचरा/ प्रतिनिधी       "संवाद हरवल्यास भाषा संपते, भाषा संपल्यास शिक्षण संपते, शिक्षण संपल्यास संस्कृती संपते आणि संस्कृती संपल्यास देश संपतो. त्यामुळे बोलीभाषेतून सुसंवाद साधत संवादाची परंपरा जपणे ही काळाची गरज आहे. शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांतील ज्ञान नव्हे, तर मुलांमधील सुप्त कला, सर्जनशीलता आणि संस्कारांचा सर्वांगीण विकास होय," आजच्या एआयच्या जमान्यात संवादाला फार महत्त्व असून एआय माहिती देईल जगण्याची दिशा देऊ शकत नाही असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांनी केले.        धी आचरा पीपल्स असोसिएशन, मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे आयोजित आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी सत्कार समारंभ, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण सोहळा आणि ग्रंथालय उदघाटन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मुंबई कमिटीचे अध्यक्ष प्रदीप मिराशी यांच्या अध्यक्षतेख...

सिंधुदुर्ग today

इमेज
खोल समुद्रातील मासेमारीला १ ऑगस्ट  पासून परवानगी; किनारी जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम. किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत मासेमारिस १५ ऑगस्टपर्यंत बंदी कायम. नियमांचे पालन करण्याचे मत्स्य विभागाचे आवाहन.  मुंबई, दि. २९ : राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे.  पावसाळा हा बहुतांश सागरी माशांच्या प्रजननाचा काळ असल्यामुळे दरवर्षी या काळात मासेमारीवर बंदी घातली जाते. यामुळे माशांची संख्या वाढण्यास मदत होते आणि भविष्यात मत्स्यसंपत्ती टिकून राहते. यंदा राज्य शासनाने यांत्रिक आणि यंत्रचालित मासेमारी नौकांसाठी १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत बंदी लागू केली आहे. तर केंद्र शासनाने खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत बंदी ल...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव सर्व्हिस रोड लगत ट्रक विद्युत पोल ला धडकून अपघात.  अपघातामुळे दिवसभर सर्व्हिस रोड वरील वाहतूक बंद. अपघाताने पडलेला भला मोठा चर बुजवण्याची मागणी. कणकवली प्रतिनिधी  मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव फाटा ब्रिज सर्व्हिस रोड लगत आज पहाटे ४ च्या सुमारास विद्युत पोल ला धडकून ट्रकचा अपघात झाला. या अपघातामुळे आज दिवसभर सर्व्हिस रोड वरील वाहतूक बंद पडली होती.          सदर अपघातामुळे रस्ता खचला असून विद्युत पोल मोडले आहेत. सुदैवाने कोणीही यात जखमी झाले नाही. सदर अपघात ग्रस्त ट्रक  आज सायंकाळी काढण्यात आला. मात्र त्या ठिकाणी भला मोठा चर पडल्यामुळे व याच ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने दुसरा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी संबंधित विभागाने त्या ठिकाणी संरक्षण कठडा बांधून रस्त्यावर अपघातामुळे पडलेला चर बुजविण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
मावळे आम्ही स्वराज्याचे यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना. कणकवली /प्रतिनिधी  कणकवली विभागामार्फत गुरुपौर्णिमेनिमित्त कणकवली तालुक्यातील पाच शिवस्मारकांचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे तसेच अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आणि गुरू आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मावळे आम्ही स्वराज्याचे या संघटनेतर्फे शिवस्मारक पूजन मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. यावेळी मावळे आम्ही स्वराज्याचे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष अनिकेत अनंत तर्फे, कणकवली तालुका प्रमुख प्रतीक भाट, माहिती अधिकारी नील आचरेकर तसेच इतर मावळे व रणरागिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे गुरु पौर्णिमेनिमित्त सभापती सौ हर्षदा वाळके यांनी वयोवृद्ध कलाकार यांचा केला सत्कार. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे वतीने आज गुरु पौर्णिमेनिमित्त सभापती सौ हर्षदा वाळके यांनी नांदगाव वाघाची वाडी येथील वयोवृद्ध कलाकार पेंटर बाबूराव मेस्त्री यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचा शाल,श्रीफळ, पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.       यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, ग्रामपंचायत सदस्या सौ पुजा सावंत, बुथ अध्यक्ष कमलाकर पाटील तसेच मेस्त्री कुटुंबीय उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
दोन वेळा शेतकरी कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री;मंत्री नितेश राणे. कर्जमाफी, वीज माफी मुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ३८ हजार कोटी ची कर्जमुक्ती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ३६ हजार ५८५ कोटीची लाभ देणारी कर्जमुक्ती. ४८ हजार कोटी ची शेतकऱ्यांची विज बिल थकबाकी  केली माफ. शेतकरी हितासाठी महायुती सरकारने मोठे निर्णय घेतले;आणखी निर्णयांची घोषणाही लवकर. पालकमंत्री नितेश राणे यांचा पत्रकार परिषदेत विश्वास. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात प्रथमच दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती जाहीर केली असून, महाराष्ट्राच्या इतिहासात दोन वेळा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचे  मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केला. ४८ हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची असलेली विज बिल थकबाकी माफ करणारे महायुती सरकार हे सुद्धा एकमेव अ...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे शनिवार २५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर. ओम गणेश निवासस्थानी घेणार जनतेच्या गाठीभेटी. कणकवली प्रतिनिधी  राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सकाळच्या सत्रात कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत. तसेच नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.