सिंधुदुर्ग today
विवेकाची जागृती करणे म्हणजेच खरे शिक्षण -अजय कांडर. राजापूर मराठे कॉलेज येथे 'शिक्षक आणि विवेकशीलता' विषयाची मांडणी. राजापूर/ प्रतिनिधी : तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात विवेक हरवत चालला आहे. माहितीचा महापूर आला आहे, पण ज्ञानाचा दुष्काळ पडला आहे. अशा सामाजिक व्यवस्थेत विवेक सदैव जागरूक ठेवणे हेच आजच्या शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. विचारनिष्ठा हरवून बसल्याने समाजभान विवेकापासून दूर जात आहे, यासाठी विवेकाच्या मार्गावर चालणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या राजापूर विखारे गोठणे येथील आबासाहेब मराठे कॉलेज, सांस्कृतिक विभाग व प्राध्यापक प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकदिन समारंभात 'शिक्षक आणि विवेकशीलता' या विषयावर अजय कांडर बोलत होते. प्राचार्य डॉ. राजाराम राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचारी यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कव...