पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची घेतली शाळा ; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश. रस्ते, शिवसृष्टी आणि देवगड नळपाणी योजनांचा पालकमंत्र्यांकडून  सखोल आढावा. सिंधुदुर्गच्या विकासकामांवर पालकमंत्री नितेश राणेंची बारकाईने नजर. पालकमंत्री नितेश राणे यांचा विविध विकासकामांचा सखोल आढावा. सिंधुदुर्गनगरी: (ऋषिकेश मोरजकर) जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती देत नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आलेली विविध कामे, राजकोट शिवसृष्टी प्रकल्प आणि देवगड नळपाणी योजनेचा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी स्वतंत्र बैठका घेऊन सविस्तर आढावा घेतला.  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणे, खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देणे, शिवसृष्टी प्रकल्पाला गती देणे आणि देवगड नळपाणी योजना सुरळीत व दीर्घकालीन स्वरूपात कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात आयो...

सिंधुदुर्ग today

इमेज
आगाऊ धान्य वितरणाच्या निर्णयाचा पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सखोल आढावा. पुरवठा विभागाला वरिष्ठ स्तरावर पाठपुराव्याच्या सूचना; ई-पॉस तांत्रिक अडचणी सोडविण्यावर भर. सिंधुदुर्गनगरी, दि. १ (ऋषिकेश मोरजकर) : कोकणातील दुर्गम व डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांचे धान्य एकत्रितपणे वितरित करण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सविस्तर आढावा घेतला. लाभार्थी व रेशनिंग दुकानदारांची गैरसोय टाळण्यासाठी पुरवठा विभागाने शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करून योग्य तो मार्ग काढावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रेशनिंग धान्य दुकानदार व रॉकेलधारक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री राणे बोलत होते. तीन महिन्यांच्या धान्याची एकत्रित उचल व वितरण करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन...

सिंधुदुर्ग today

इमेज
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक. भगवान लोके ; सावडाव धबधबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृक्ष लागवड. कणकवली : कणकवली तालुका पत्रकार संघ सातत्याने सामाजिक बांधिलकीचे उपक्रम घेवून काम करत आहेत. गेल्यावर्षी सावडाव धबधबा परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावर्षी पत्रकार संघाच्यावतीने सावडाव धबधबा परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबवला आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याचे मत अध्यक्ष भगवान लोके यांनी व्यक्त केले.  सावडाव धबधबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ सावडाव सरपंच आर्या वारंग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष भगवान लोके , जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ, उपसरपंच दत्ता काटे, सचिव संजय सावंत , खजिनदार रोशन तांबे ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे , माजी अध्यक्ष रमेश जोगळे , अजित सावंत, चंद्रशेखर देसाई , महेश सरनाईक, सुधीर राणे , उमेश बुचडे , दर्शन सावंत, नितीन कदम, विशाल रेवडेकर, तुषार हजारे , तुषार सावंत, उत्तम सावंत, ...

सिंधुदुर्ग today

इमेज
स्कॉलरशिप परीक्षेत पाचवीतील मीरा सामंत जिल्ह्यात प्रथम;  आम. निलेश राणेंच्या हस्ते झाला सन्मान.  कुडाळ पंचायत समितीच्या वतीने केले होते आयोजन.  सिंधुदुर्ग /प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष 2025/2026 स्कॉलरशिप परीक्षेत पाचवीत इयत्ते मधून कुडाळची मीरा महादेव सामंत ही विद्यार्थिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर आज आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या विद्यार्थांचा कुडाळ पंचायत समिती च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.      तीच्या या यशाबद्दल कुडाळ येथील सामंत परिवार तसेच नांदगाव येथील मोरये परिवार यांनी अभिनंदन केले आहे...

सिंधुदुर्ग today

इमेज
प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात पालकमंत्री नितेश राणे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाद्वारे शासनाच्या विविध सेवांचा लाभ. जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ भागांत शासकीय सेवा ऑफलाइन देण्यासाठी प्रयत्न करणार. कणकवली, दि. ३१ (ऋषिकेश मोरजकर) :  सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा जलद, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.  'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' ही संकल्पना त्याच उद्देशाने राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून अधिक गतीने काम करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व सेवा पोहोचवून छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य साकार करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून कणकवली येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान'चा शुभारंभ ...

सिंधुदुर्ग today

इमेज
अल्पवयीन बहिणीवर अत्याचार प्रकरणी सख्खा भावाची सशर्त जामिनावर मुक्तता. ॲड. प्राजक्ता शिंदे-सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली/ प्रतिनिधी    अल्पवयीन सख्ख्या बहिणीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीची विशेष सत्र न्यायाधीश ओरोस यांनी 50 हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली.आरोपीतर्फे ॲड. प्राजक्ता म. शिंदे-सावंत यांनी यशस्वी युक्तिवाद केला.       कुमार नारायण राठोड, (वय 23 वर्षे, रा. मखनापूर, ता. उत्तर विजापूर, जि. विजापूर, राज्य कर्नाटक ) हा या प्रकरणी संशयित आरोपी असून त्याच्यावर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणातील अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ओरोस येथील घरी कोणी नसताना तिचा सख्खा भाऊ कुमार राठोड याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. तो सख्खा भाऊ असल्याने घरात वाद होतील या भीतीने तिने सुरुवातीला कोणालाही याबाबत सांगितले नाही. तसेच पोलीस भावाला अटक करतील या भीतीने सुरुवातीला सिंधुदुर्गनगरी पोली...

सिंधुदुर्ग today

इमेज
एआय माहिती देईल पण जगण्याला दिशा देऊ शकत नाही - अजय कांडर. आचरा ज्युनिअर कॉलेज पारितोषिक सोहळा आणि ग्रंथालय उद्घघाटन समारंभ. आचरा/ प्रतिनिधी       "संवाद हरवल्यास भाषा संपते, भाषा संपल्यास शिक्षण संपते, शिक्षण संपल्यास संस्कृती संपते आणि संस्कृती संपल्यास देश संपतो. त्यामुळे बोलीभाषेतून सुसंवाद साधत संवादाची परंपरा जपणे ही काळाची गरज आहे. शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांतील ज्ञान नव्हे, तर मुलांमधील सुप्त कला, सर्जनशीलता आणि संस्कारांचा सर्वांगीण विकास होय," आजच्या एआयच्या जमान्यात संवादाला फार महत्त्व असून एआय माहिती देईल जगण्याची दिशा देऊ शकत नाही असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांनी केले.        धी आचरा पीपल्स असोसिएशन, मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे आयोजित आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी सत्कार समारंभ, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण सोहळा आणि ग्रंथालय उदघाटन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मुंबई कमिटीचे अध्यक्ष प्रदीप मिराशी यांच्या अध्यक्षतेख...