पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्गसाठी मोठी बातमी: खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजने'तंर्गत ४७ कोटींपेक्षा अधिक निधीचे १२ पूल मंजूर! सिंधुदुर्ग: (ऋषिकेश मोरजकर)   सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते आणि दळणवळण व्यवस्थेला मोठा वेग मिळणार आहे. 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-भाग ३' (PMGSY-III) अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी एकूण ४७ कोटी ३६ लाख ६४ हजार रुपये निधीच्या १२ मोठ्या पुलांच्या (LSB) कामांना मंजुरी मिळाली आहे. या विकासकामांमुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क सुलभ होणार असून, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या कायमच्या मिटणार आहेत. तालुकानिहाय मंजूर पुलांची यादी आणि खर्च (लाखांत): १. देवगड तालुका: फणसगाव महाळुंगे रस्ता (कि.मी. ६/२४०): २४ मीटर लांबीच्या पुलासाठी २ कोटी ७१.५८ लाख रुपये मंजूर. २. दोडामार्ग तालुका: पाडवे कोलझर कुंभवडे पणतुर्ली रस्ता (साखळी २/५५०): २२ मीटर लांबीच्या पुलासाठी २ कोटी ७८.०५ लाख रुपये मंजूर. भेडेशी खान्याळे शिरंगे पुनर्वसन रस्ता (सापुलासाठी ३...

सिंधुदुर्ग today

इमेज
खोटेपणाच्या काळात कवीने सत्यच सांगायला हवे - अजय कांडर. श्रीरामपूर महाविद्यालयातर्फे 'कवीचा वर्तमान हस्तक्षेप' विषयावर व्याख्यान. कणकवली/प्रतिनिधी       अनिष्ट काम करणाऱ्या व्यवस्थेला खरं सुनावणं हेच कवी लेखकाचं काम आहे. गप्प बसणं म्हणजे अन्यायाला साथ देणे असते. कवीने खोटेपणाच्या काळात त्याच्या लेखनातून सत्य सांगणे हीच क्रांती असते.जे मुके आहेत, ज्यांना दिसत नाही, ज्याना ऐकू येत नाही त्यांचा आवाज होणे हाच कवीचा वर्तमान हस्तक्षेप असतो असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी 'कवीचा वर्तमान हस्तक्षेप ' या व्याख्यानात केले.            स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन अहिल्यानगर श्रीरामपूरतर्फे कवी अजय कांडर यांचे सदर विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या व्याख्यानात बोलताना कांडर यांनी समाजात कवीचा हस्तक्षेप म्हणजे लेखकाने सामाजिक प्रश्नांवर कशी भूमिका घ्यावी, एवढ्या पुरताच तो महत्त्वाचा नसतो तर कवीच लेखन आणि स्वतःच वर्तन या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात असेही आग्रहाने सांगितले.यावेळी कार्यक्रमाच...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा ते वरवडे सेंट उर्सुला स्कूलपर्यंत एसटी बस सेवा सुरु करा. नांदगाव पंचक्रोशीतील एसटीच्या अधिका-यांकडे मागणी ; विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने वेधले लक्ष. कणकवली : कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी वरवडे येथील सेंट उर्सुला स्कुल मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिकत आहेत. येथील विद्यार्थ्यांच्या पालकांना खाजगी वाहनाने पाठवताना आर्थिक कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नांदगाव तिठा ते वरवडे येथील सेंट उर्सुला इंग्लिश स्कूलपर्यंत एसटी बस सेवा सुरु करण्याची मागणी नांदगाव व असलदे ग्रामपंचायतच्यावतीने वाहतूक अधिकारी गौतमी कुबडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके , नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर , विजय आचरेकर , रामचंद्र मोरये , श्रीपाद म्हापसेकर , इम्रान बटवाले , प्रशांत कदम, वसिम साटविलकर, रुबीना नावलेकर, आसिफा लांजेकर यांच्यासह पालक उपस्थित होते. नांदगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने नांदगाव तिठा तसेच पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी...

सिंधुदुर्ग today

इमेज
  मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय : पालकमंत्री नितेश राणे. राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित! मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत काँग्रेसवर घणाघात. धार्मिक स्थळांच्या विकासासह जागतिक पातळीवर भारताचा डंका. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या निर्णय आणि परिवर्तनाचा लेखाजोखा मांडला. २०१४ पूर्वी देशात असलेल्या असुरक्षिततेच्या वातावरणातून मोदींनी देशाला बाहेर काढत जागतिक पातळीवर सर्वात सुरक्षित राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वाधिक काळ पंतप्रधान होण्याचा मान मिळवणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाखाली देश आता अमेरिका, चीननंतर तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक आणि सामरिक महाशक्ती बनत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशात तुष्टीकरणाच्या राजका...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची राजेंद्र पेडणेकर व शिष्टमंडळाने घेतली भेट. कणकवली ( प्रतिनिधी ) अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायती च्या मालकी जागेतील व्यापारी वर्गाने सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांच्या उपस्थितीत कणकवली शहराचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेतली. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी समस्त व्यापारी बांधवांन सोबत दोन तास चर्चा केली, या चर्चेत अनिल मेस्त्री, राजु म्हापसेकर, महेश मेस्त्री, सचिन कुवळेकर, जमिल भाई कुरेशी, प्रभाकर कदम, यांनी विषेशतः सहभाग घेतला. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सर्वांना नव्याने व्यापारी संकुलण उभारणी करताना सर्वच बाबतीत मार्गदर्शन केले, तसेच सर्वांना आश्वासन दिले की नव्याने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलणा मध्ये सर्वांना समाविष्ट करण्याचा आपण पर्यंत करू असे म्हटले. उपस्थित सर्व व्यापारी बांधवांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना निवेदन दिले, या निवेदनात असे म्हटले आहे की कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे असलेले नगरपंचायत मालकीचे व्यापारी मार्केट ( पुर्वी चे भाजी मार्केट) मधील स्लॅब ची इमारत पूर्णतः कोसळण्याच्या मार्गावर असून, प...

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुरत्न समृद्ध योजने'च्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार - पालकमंत्री नितेश राणे.   सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (ऋषिकेश मोरजकर) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी आणि रोजगार निर्मितीला चालना देणारी महत्वाकांक्षी अशी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली सर्व कामे संबंधित यंत्रणेने निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत. ‘सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या माध्यमातून लोककल्याणकारी आणि विकासाभिमुख योजना राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे सिंधुरत्न कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.   १८ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ला मान्यता देण्यात आली आहे. या अनुषंगाने योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होते. बैठकीस आमदार दीपक केसरकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपवनसंरक्ष...

सिंधुदुर्ग today

इमेज
राज्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कटीबद्ध  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) प्रधानमंत्री जन मन योजना अंतर्गत करंजे येथे आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. राज्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे मस्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री जन मन आवास योजना योजनेअंतर्गत ग्रामपंचायत करंजे गावामध्ये 4 घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी सर्व चारही घरकुले पूर्ण झाली आहेत. सदर योजनेतील लाभार्थी भूमिहीन असल्याने त्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय (PDU) योजनेअंतर्गत गावातील श्रीमती वैजयंती मौर्य, शिवाजी वाळके,  विठ्ठल वाळके, श्रीमती निर्मला परब व श्रीमती मयुरी शिरसाठ यांनी घरकुल बांधकामासाठी एकुण ४ आर क्षेत्र बक्षीसपत्राद्वारे उपलब्ध करून दिले आहे. लाभार्थ्यांना सदर जमीन खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्...