सिंधुदुर्ग today
ग्रामीण भागातील शाळांना दिलासा; २० विद्यार्थ्यांवर ३ शिक्षकांना मान्यता. पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. राज्य सरकारने क्रांतिकारी निर्णय घेत शिक्षण क्षेत्रात टाकले पुढचे पाऊल. शिक्षण मंत्री दादा भुसे,यांच्या समवेत उद्योग मंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या बैठकांना आले यश. सिंधुनगरी (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग सह कोकण अशा ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना जाचक ठरणारा पटसंख्येचा निकष बदलणारा क्रांतिकारी निर्णय सिंधुदुर्ग चे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या ठाम भूमिकेमुळे शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व कोकणातील आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयावर अखेर या निर्णयामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग कोकण सह दुर्गम भागातील शाळांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनाने सन २०२५-२६ च्या सं...