पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
सुशांत दळवी खूनप्रकरणी सखोल तपासाची मागणी.! कळसुली ग्रामस्थांचे पालकमंत्री नाम. नितेश राणेंना निवेदन.! पोलिसांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना ; असतील तेवढे आरोपी जेरबंद होतील.! पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला विश्वास.! कणकवली : प्रतिनिधी  बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांच्या निर्घृण खूनप्रकरणी सखोल व निष्पक्ष तपास करून मुख्य आरोपींना अटक करावी, अशी मागणी कळसुली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २७ मार्च रोजी कणकवली येथे सुशांत दळवी यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असली, तरी खुनाची पद्धत व स्वरूप पाहता हे कृत्य एकट्या व्यक्तीकडून झालेले नसून यात इतरही काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अटक करण्यात आलेल्या आरोपीची शारीरिक स्थिती लक्षात घेता त्याच्याकडून एकट्याने असे कृत्य होणे संशयास्पद असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. तसेच, मुख्य सूत्रधारांनी पोल...

सिंधुदुर्ग today

इमेज
मार्च एंडपूर्वीच सिंधुदुर्गचा विक्रम; २८२ कोटींचा १००% निधी वितरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राज्यात अव्वल; नियोजनबद्ध कामगिरीमुळे विकासकामांना वेग सिंधुदुर्गनगरी (ऋषिकेश मोरजकर): मार्च अखेर जवळ येत असताना प्रशासनात नेहमीप्रमाणे निधी खर्च आणि वितरणाची मोठी धावपळ सुरू असते. मात्र, यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही धावपळ यशात परिवर्तित करत संपूर्ण राज्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याचा २८२ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा १०० टक्के पूर्ण करत, सर्व संबंधित विभागांना निधी वितरित करण्याच्या कामगिरीत सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यात प्रथम स्थानी तर अमरावती द्वतीय स्थानी आहे.पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीमुळे राज्यात जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्ह्यात विविध सरकारी विभागांच्या सुमारे १०० योजनांच्या माध्यमातून यंदा मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या सर्व योजनांना गती देण्यासाठी राज्य शासनाने २८२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. विशेष बाब म्हणजे, मार्च अखेर उजाडण्यापूर्वीच हा संपूर्ण निधी संबंधित विभागांना यशस्वीपणे वितरित क...

सिंधुदुर्ग today

इमेज
व्यावसायिक एलपीजी वाटपासाठी PNG (Piped Natural Gas) जोडणी आवश्यक सिंधुदुर्गातील ग्राहकांना अर्ज करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी, दि. २७ (ऋषिकेश मोरजकर .) :केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्राप्त निर्देशानुसार, व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG) वाटपाबाबत सर्व राज्यांच्‍या मुख्य सचिवांना महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक/औद्योगिक (हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्‍टीन, अन्‍न प्रक्रिया / दुग्‍धव्‍यवसाय, सामुदायिक स्‍वयंपाकघरे इ.) एलपीजी (Commercial )  ग्राहकांना सूचित करण्यात येते की, व्यावसायिक एलपीजीच्या एकूण 50% वाटपातून पात्र होण्‍यासाठी संबंधित ग्राहकांनी प्रथम या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या City Gas Distribution (CGD) संस्थेकडे Piped Natural Gas (PNG) जोडणीसाठी अर्ज करण्‍यास पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या २७ मार्च २०२६च्या पत्रान्वये सुचवले आहे. त्‍याकरिता  ग्राहकांनी खालील दिलेल्‍या नंबरवर अथवा कंपनीकडे संपर्क साधावा.  Address –   Maharashtra Natural Gas Limited, Shree...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे शनिवार २८ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर. कणकवली /प्रतिनिधी  राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शनिवार २८ मार्च रोजी  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते  जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.  जनता,कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
पेट्रोल-डिझेल अनधिकृतरीत्या साठवू नका नियमभंग केल्यास प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा बाटली, प्लास्टिक कॅन, बॅरलमध्ये इंधन देण्यास बंदी. सिंधुदुर्गनगरी, दि. २६ (ऋषिकेश  मोरजकर) : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा पुरेसा आहे. काही नागरिक आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कॅन, लोखंडी बॅरल, बाटल्या किंवा इतर असुरक्षित साधनांमध्ये पेट्रोल-डिझेलची साठवणूक करीत असल्याबाबत आढळून  आले आहे. पेट्रोल आणि डिझेल हे अति-ज्वलनशील पदार्थ आहेत. निवासी क्षेत्रांमध्ये, गजबजलेल्या ठिकाणी किंवा अनधिकृत गोदामांमध्ये अशा प्रकारे इंधनाचा साठा करणे हे नियमांचे उल्लंघन करणारे आहे. निवासी भागात किंवा असुरक्षित ठिकाणी त्यांचा साठा करणे हे सार्वजनिक सुरक्षिततेसाठी आणि मानवी जीवनासाठी गंभीर धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे, सार्वजनिक शांतता राखण्यासाठी आणि संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अनिवार्य आहे.  ही परिस्थिती लक्षात घेता, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आणि इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण...

सिंधुदुर्ग today

इमेज
कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ४२  हजार रुपये तर  विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी २२ हजार रुपये मिळणार. हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान; सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.  सिंधुदुर्ग today : (ऋषिकेश मोरजकर) चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू पिकांना मोठा फटका बसला असून फळधारणेत मोठी घट झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कोकणातील शेतकऱ्यांसाठी  मदतीचे विशेष पॅकेज जाहीर केले.यात विमा काढलेला शेतकऱ्यांना हेक्‍टरी 42 हजार रुपये तर  विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 22 हजार रुपये अशा पद्धतीने ही मदत दिली जाणार आहे. असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या नुकसान भरपाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. पालक...

सिंधुदुर्ग today

इमेज
आंबेडकर चौकातील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अजय कांडर प्रमुख पाहुणे म्हणून कवी वीरधवल परब निमंत्रित नाटककार सिद्धार्थ तांबे यांच्या स्मरणार्थ १२ एप्रिल रोजी सावंतवाडीत संमेलन संमेलन आयोजक विठ्ठल कदम, मधुकर मातोंडकर यांची माहिती सावंतवाडी / प्रतिनिधी      'जाता नाही जात' या गाजलेल्या नाटकाचे लेखक - कवी सिंधुदुर्ग सुपूत्र प्रा. सिद्धार्थ विष्णू तांबे (शिरवल/कणकवली) यांच्या स्मृती जपण्यासाठी यावर्षीपासून त्यांच्या सिंधुदुर्गातील मित्रमंडळींतर्फे कवी तांबे यांच्या गाजलेल्या 'आंबेडकर चौक' या शीर्षकाने साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. यावर्षीच्या पहिल्या आंबेडकर चौक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी अजय कांडर यांची निवड करण्यात आली असून संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवी वीरधवल परब यांना निमंत्रित करण्यात आले आहे. रविवार 12 एप्रिल रोजी सायं.4.30 वा.सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे प्रमुख आयोजक साहित्य संस्कृती मंडळाचे विद्यमान सदस्य तथा कवी विठ्ठल कदम आणि कवी मधुकर मातोंडकर यांनी दिली. ...