पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता. अँड उमेश सावंत यांनी पाहीले काम.  कणकवली / प्रतिनिधी आपल्या ताब्यातील मोटरसायकल बेदरकारपणे व निष्काळजीपणे चालवून अनंत नाटळकर यांच्या दुखापती व उपचारादरम्यान मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आशिये येथील साहिल संदेश ठाकूर याची येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी शुभम लटुरिया यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. अनंत नाटळकर हे २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबई गोवा महामार्गावरील वागदे येथील साफल्य स्वीट या दुकानात खाजा घेण्यासाठी गेले होते. त्यांनी दुकानासमोर मोटरसायकल थांबविली असता समोरून आलेल्या मोटरसायकलस्वाराने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार ठोकर दिली. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर प्रथम कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर गोवा येथे उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध भादवी कलम ३०४ अ २७९, ३३७, ३३८, मोटर वाहन कायदा १८४ ३ (१), १८१ व १४६/१९६ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोषारोप ठेवण्यात आला होता. सुनाव...

सिंधुदुर्ग today

इमेज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६. सिंधुदुर्गात ५,११८ कर्जखात्यांची तपासणी पूर्ण. शेतकऱ्यांनी ऑनलाइन आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन. सिंधुदुर्गनगरी, दि. २ (ऋषिकेश मोरजकर) : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील एकूण ५ हजार ११८ कर्जखात्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी ४ हजार ८ कर्जखाती पात्र ठरली असून, आतापर्यंत ३ हजार ९५६ खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली असल्याची माहिती ही माहिती सहायक निबंधक सुनिल मरभळ यांनी दिली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेतील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासकीय लेखापरीक्षकांमार्फत तपासण्यात आली. या तपासणीनंतर पात्र ठरलेल्या कर्जखात्यांची माहिती शासनाने उपलब्ध करून दिलेल...

सिंधुदुर्ग today

इमेज
पुढील आठवड्यात महाकर्जमुक्ती लाभ वाटपाला होणार प्रारंभ. ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमुक्तीपलीकडे शाश्वत शेतीचा शासनाचा व्यापक आराखडा. सिंधुदुर्गनगरी, (ऋषिकेश मोरजकर) : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्ष लाभ वितरणास सुरुवात होणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने दिलेल्या सूचनांची प्रत्येक जिल्हा प्रशासनामार्फत काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे.             राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यासाठी सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राला आर्थिक स्थैर्य प्रदान करणे, शेतकऱ्यांना नव्याने कर्जपात्र बनविणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.             दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर तसेच हवामानातील अनिश्चिततेमुळे राज्यातील शेतकरी वारंवार आर्थिक संकटां...

सिंधुदुर्ग today

इमेज
'ॲड. देवदत्त परुळेकर लिखित 'आजच्या काळासाठी तुकोबा' ग्रंथावर मालवणात ५ रोजी परिसंवाद डॉ. राजन गवस, डॉ.नंदकुमार मोरे, डॉ.गोविंद काजरेकर,प्रा.संजीवनी पाटील आदी अभ्यासकांचा सहभाग. समाज साहित्य प्रतिष्ठान - बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे कार्यक्रमाचे आयोजन. कणकवली / प्रतिनिधी समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ह.भ.प. ॲड. देवदत्त परुळेकर लिखित व प्रभा प्रकाशन, कणकवली प्रकाशित 'आजच्या काळासाठी तुकोबा' या ग्रंथावर रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात शिवाजी विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख आणि संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, समीक्षक-कवी प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर आणि समीक्षक तथा ‘प्रभा साहित्य मैफल’ या साहित्यिक नियतकालिकाच्या संपादक प्रा. संजीवनी पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.           ...

सिंधुदुर्ग today

इमेज
झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या विरोधातील अविश्वास ठराव कायम जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा निर्णय कणकवली / प्रतिनिधी थेट निवडणूकीतून सरपंचपदी निवडून आलेल्या कुडाळ तालुक्यातील झाराप सरपंच दक्षता दशरथ मेस्त्री यांच्यावर सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूरीनंतर ग्रामसभेनेही ठराव मंजूर केला होता. त्याविरूद्ध दक्षता मेस्त्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेला विवाद अर्ज फेटाळत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसभेने मंजूर केलेला अविश्वास ठराव कायम केला आहे. अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या आठ ग्रामपंचायत सदस्यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. दक्षता मेस्त्री या सन २०२२ मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मनमानी, एकतर्फी कार्यपद्धतीच्याविरोधात नऊ सदस्यांपैकी उपसरपंच मंगेश गांवकर, तनया मांजरेकर, प्रियांका रेडकर, अमृता हरमळकर, संजिवनी पेंडूरकर, विजय हरमळकर, अश्पाक कुडाळकर व विशाखा गोडे या आठ सदस्यांनी तहसिलदार कुडाळ यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला. त्यावर १० एप्रिल रोजी तहसिलदारांनी विशेष सभा आयोजित केली होती. यावेळी हा ठराव आठ विरूद्ध दोन मतांनी...

सिंधुदुर्ग today

इमेज
  गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत योजना कणकवली /प्रतिनिधी  गेल्या २० वर्षांपासून दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहे. उत्तम गुणवत्ता आणि शिक्षणाची जिद्द असूनही आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये या उद्देशाने दिशा परिवार समाजातील दानशूर व्यक्ती आणि अशा विद्यार्थ्यांना एकत्र जोडण्याचे कार्य करत आहे. शैक्षणिक मदतीसाठी अटी व पात्रता कला, वाणिज्य, शास्त्र, अभियांत्रिकी ( शासकीय महाविद्यालय) आर्किटेक्चर, कृषी, फार्मसी, नर्सिंग मध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि इ. १२ वी मध्ये ८०% गुण असणाऱ्या गरजू व गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल. इयत्ता १०वी नंतर डिप्लोमासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेणारे गरजू विद्यार्थी अर्ज करू शकतात. सदर मदतीमध्ये कॉलेजची फी, राहणे, जेवणे यासाठी उपलब्ध निधीनुसार मदतीचा विचार केला जाईल. महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थी; ज्यांचे पालक शेत मजूर, अल्प भू धारक, अल्प उत्पन्न धारक आहेत अथवा ज्या विद्यार्थ्यांचे पालक हयात नाहीत अशा विद्यार्थ्यां...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील विजय ज्ञानदेव मोरये यांचे निधन. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव सिसयेवाडी महापुरुष मंडळाचे सभासद उद्योजक विजय ज्ञानदेव मोरये यांचे नुकतेच अल्पशा आजाराने  मुंबई येथील राहत्या घरी निधन झाले आहे ते 76 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने नांदगाव गावातून हळहळ व्यक्त होत आहे