पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
महावितरणच्या निष्क्रिय कारभाराविरोधात उद्या कणकवली येथे “गरमागरम चाय पे चर्चा” कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या वीज समस्यांमुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी आता थेट महावितरण अधिकाऱ्यांनाच जाब विचारण्याचा निर्धार केला असून, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, कणकवली तालुका व्यापारी संघटना आणि कणकवली तालुका वीज ग्राहक संघटना यांच्या संयुक्त पुढाकारातून उद्या शुक्रवार दिनांक २९ मे २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत महावितरण कार्यकारी अभियंता, कणकवली यांच्या केबिनमध्ये “गरमागरम चाय पे चर्चा” हा अभिनव पण तितकाच आक्रमक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. मालवण, देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील तब्बल १ लाख ७५ हजारांहून अधिक अन्यायग्रस्त वीज ग्राहकांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, आगामी पावसाळ्यात दर्जेदार, सुरळीत आणि २४ तास अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी थेट अधिकाऱ्यांशी चर्चा करत नागरिक आपल्या संतप्त भावना व्यक्त करणार आहेत. महावितरण कंपनीकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब व सर्वसामान्य वीज ग्राहकांची सातत्याने आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप संघटना...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त दीर्घ काव्यलेखन स्पर्धा. विजेत्या कवीला १० हजारांचे पारितोषिक. समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचा उपक्रम. कणकवली/प्रतिनिधी कामगार-श्रमिकांच्या व्यथांना शब्दरूप देणारे क्रांतिकवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या वतीने खुली दीर्घ काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट एका कवितेस ‘नारायण सुर्वे पारितोषिक’ म्हणून 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि ग्रंथ प्रदान करण्यात येणार आहे.         नारायण सुर्वे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील हेत या गावचे सुपुत्र. मुंबईच्या गिरणगावात हमाली करणाऱ्या, रस्त्यावर झोपणाऱ्या कष्टकऱ्यांचे जगणे त्यांनी आपल्या कवितेतून मांडले. ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘माझे विद्यापीठ’, ‘जाहिरनामा’ यांसारख्या संग्रहांतून त्यांनी शोषितांच्या वेदनेला क्रांतीची धार दिली. श्रमिकांचे जीवन, मुंबईची झोपडपट्टी, भुकेलेले जग आणि व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश हा त्यांच्या कवितेचा आत्मा होता. त्यामुळेच त्यांना ‘क्रांतिकारी कवी’ म्हणून ओळखले जाते...

सिंधुदुर्ग today

इमेज
अंजली ढमाळ लिखित 'निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर 30 रोजी परिसंवाद.  समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे आयोजन. कणकवली/प्रतिनिधी        स्त्री-जीवनातील चौकटी, त्यांची घुसमट आणि त्या मोडून बाहेर पडण्याची धडपड मांडणाऱ्या  ‘निखळत्या चौकटीत’ या अंजली ढमाळ लिखित,रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या कादंबरीवर समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे शनिवार, 30 मे 2026  रोजी स.10.30 वा. पुणे. एस. एम. जोशी सोशॅलिस्ट फाऊंडेशन, नवी पेठ येथे विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. समीक्षक रेखा इनामदार साने यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात वक्ते म्हणून समीक्षक रणधीर शिंदे,स्त्री साहित्याच्या अभ्यासक गीताली वि.म. आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार कृष्णात खोत सहभागी होणार असल्याची माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अजय कांडर आणि मधुकर मातोंडकर यांनी दिली.        लेखिका अंजली ढमाळ लिखित आणि रोहन प्रकाशनने प्रकाशित केलेली ‘निखळत्या चौकटीत’ ही कादंबरी अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरली आहे. परंपरेच्या, नात्यांच्या आणि सामाज...

सिंधुदुर्ग today

इमेज
आकाशवाणीवरून उलगडत आहे ‘अज्ञात मुंबई’ सिंधुदुर्ग सुपुत्र लेखक नितीन साळुंखे यांच्या पुस्तकावर आधारित कार्यक्रम मुंबई आकाशवाणी अस्मिता वाहिनी - एफ.एम.रेडिओवर प्रसारण कणकवली / प्रतिनिधी       सात बेटांपासून सुरू झालेल्या मुंबई नगरीचा इतिहास, तिच्या गल्ल्याबोळांतील न ऐकलेल्या कथा आणि ऐतिहासिक पाऊलखुणा आता रेडिओच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचणार आहेत. आकाशवाणी मुंबईने सिंधुदुर्ग सुपुत्र लेखक नितीन साळुंखे लिखित 'अज्ञात मुंबई’  या ग्रंथाची विशेष श्रुतिका कार्यक्रम 10 मे 2026 पासून सुरू केला आहे. सकाळ प्रसन्न करणारा हा कार्यक्रम स.7:45 वाजता मुंबई आकाशवाणी एफएम रेडिओवर आणि  स. 9 वा. मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर प्रसारित होत आहे.     या कार्यक्रमाची संकल्पना शैलेश माळोदे यांची असून वाचन अभिनेत्री नेहा कुलकर्णी आणि अभिनेता अक्षय शिंपी करत आहेत. निवेदनाची धुरा ज्योत्स्ना केतकर सांभाळत आहेत. मुंबईच्या ‘ज्ञात’ गर्दीत दडलेले ‘अज्ञात’ किस्से, वास्तूंच्या मागच्या कहाण्या आणि शहराच्या घडणीचे अनोखे टप्पे या कार्यक्रमातून उलगडत आहेत.       ...

सिंधुदुर्ग today

इमेज
'करवीर हायकर्स' च्या सातजणांची तिरंगा फडकवून, संविधान उद्देशिका प्रदर्शनाने एवरेस्ट बेस कँप' यशस्वी रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा सपत्निक समावेश रत्नागिरी, दि. २५ -  (ऋषिकेश मोरजकर) कोल्हापूरच्या 'करवीर हायकर्स' च्या सातजणांनी अत्यंत प्रतिकूल हवामानातील आणि खडतर अशी समुद्र सपाटीपासून ५३६४ मीटर उंचीवर पोहचत 'एव्हरेस्ट बेस कँप' मोहीम शनिवारी यशस्वी केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, त्यांच्या पत्नी डाॕ सुप्रिया यांचा यात समावेश आहे.      वयाच्या २१ व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या आणि जगातील मृत्यूचा पर्वत अशी ओळख असणाऱ्या 'अन्नपूर्णा' पर्वत सर करणाऱ्या जगातील सर्वात तरुण ठरलेल्या करवीर हायकर्सच्या कस्तुरी सावेकर यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली.      'एव्हरेस्ट बेस कँप'साठी भगवान गौतम बुध्दांच्या जन्मभूमीत नेपाळ-काठमांडूत १५ मे रोजी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप करून अमित ठाकरे यांचा वाढदिवस साजरा मनसे विद्यार्थी सेनेचा समाजसेवेचा उपक्रम कणकवली : प्रतिनिधी   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. श्री अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे फळवाटपाचा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. मनविसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री अनिकेत अनंत तर्फे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी रुग्णांना फळवाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मनसे कणकवली तालुकाध्यक्ष श्री शांताराम सादये यांनी, “समाजसेवेची बांधिलकी जपणाऱ्या नेत्याचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करणे हीच खरी कार्यकर्त्यांची ओळख आहे,” असे मत व्यक्त केले. तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. या प्रसंगी मनसे विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे मनसे तालुकाध्यक्ष श्री शांताराम सादये उपतालुकाध्यक्ष श्री अतुल दळवी, मनविसे कणकवली तालुकाध्यक्ष श्री सम...

सिंधुदुर्ग today

इमेज
वारंवार वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्या ;मान्सूनपूर्व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा पालकमंत्री नितेश राणे नागरिकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद द्या, लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा सिंधुदुर्गनगरी दि. २१ (ऋषिकेश मोरजकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने संबंधित यंत्रणेने अधिक सतर्क राहून वारंवार वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच वीजेसंबंधित मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची उर्वरित सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग मंडळ अंतर्गत विद्युत उपकरणांची देखभाल, दुरुस्ती व विविध अडचणी संदर्भात दूरदृश्य प्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे तसेच सर्व शाखाधिकारी व उपविभागीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, नियोजित वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना ...