सिंधुदुर्ग today
खत कंपन्यानी शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी - विठ्ठल देसाई. कणकवली खरेदी विक्री संघ संघाच्या वतीने खरीब हंगाम बैठक ; तालुक्यातील सर्व सोसायटीने खत विक्रीसाठी परवाना काढण्याच्या सूचना. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुका खरेदी विक्री संघ हा नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. त्यामुळे खत कंपन्यांनी दरवर्षीप्रमाणेच वेळेत खत पुरवठा करावा. युद्धजन्य परिस्थितीमुळे खत तुटवडा निर्माण झाल्यास आता रोख स्वरुपात खत खरेदी सोसायटीना करावी लागणार आहे. आर्थिक भार पडत असेल त्यांनी जिल्हा बँकेकडे कर्ज आवश्यक असल्यास प्रस्ताव तातडीने करावेत. शासनाने युरियावरील सवलत कमी करावी,त्यामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. त्याऐवजी सुफला खतावर अनुदान वाढवावे.खत कंपन्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन बँक संचालक विठ्ठल देसाई यांनी केले. वागदे येथील हॉटेल विश्रांती येथे कणकवली खरेदी विक्री संघ संघाच्या वतीने खरीप हंगाम बैठकीत ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, उपाध्यक्ष सुरेश ढवळ , जिल्हा गुणवत्ता निरीक्षक सुशांत भोसले , जिल्हा मोहीम अधिकारी...