पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ४२  हजार रुपये तर  विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी २२ हजार रुपये मिळणार. हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान; सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.  सिंधुदुर्ग today : (ऋषिकेश मोरजकर) चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू पिकांना मोठा फटका बसला असून फळधारणेत मोठी घट झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कोकणातील शेतकऱ्यांसाठी  मदतीचे विशेष पॅकेज जाहीर केले.यात विमा काढलेला शेतकऱ्यांना हेक्‍टरी 42 हजार रुपये तर  विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 22 हजार रुपये अशा पद्धतीने ही मदत दिली जाणार आहे. असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या नुकसान भरपाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. पालक...

सिंधुदुर्ग today

इमेज
आंबेडकर चौकातील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अजय कांडर प्रमुख पाहुणे म्हणून कवी वीरधवल परब निमंत्रित नाटककार सिद्धार्थ तांबे यांच्या स्मरणार्थ १२ एप्रिल रोजी सावंतवाडीत संमेलन संमेलन आयोजक विठ्ठल कदम, मधुकर मातोंडकर यांची माहिती सावंतवाडी / प्रतिनिधी      'जाता नाही जात' या गाजलेल्या नाटकाचे लेखक - कवी सिंधुदुर्ग सुपूत्र प्रा. सिद्धार्थ विष्णू तांबे (शिरवल/कणकवली) यांच्या स्मृती जपण्यासाठी यावर्षीपासून त्यांच्या सिंधुदुर्गातील मित्रमंडळींतर्फे कवी तांबे यांच्या गाजलेल्या 'आंबेडकर चौक' या शीर्षकाने साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. यावर्षीच्या पहिल्या आंबेडकर चौक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी अजय कांडर यांची निवड करण्यात आली असून संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवी वीरधवल परब यांना निमंत्रित करण्यात आले आहे. रविवार 12 एप्रिल रोजी सायं.4.30 वा.सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे प्रमुख आयोजक साहित्य संस्कृती मंडळाचे विद्यमान सदस्य तथा कवी विठ्ठल कदम आणि कवी मधुकर मातोंडकर यांनी दिली. ...

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समाज कल्याण सभापती पदी ओटव गावच्या रुहिता राजेश तांबे. सर्वत्र होत आहे अभिनंदन. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य रुहिता राजेश तांबे यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या समाज कल्याण सभापती बिनविरोध निवड झाली आहे.ओटव गावच्या माजी सरपंच असलेल्या रुहिता राजेश तांबे या जिल्हा परिषद सदस्य म्हणून शिंदे शिवसेनेच्या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. आज त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समाज कल्याण सभापतीपदी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. या अगोदर ओटव गावाला मंगेश तांबे यांनी ही जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती पद भुषविले होते. रुहिता तांबे समाज कल्याण सभापती झाल्यानंतर सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
  समस्त नांदगाव गावाच्या वतीने नवनिर्वाचित सभापती सौ हर्षदा वाळके यांचा झाला सन्मान.  जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचाही झाला सत्कार.  जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा राज्य गीताने कार्यक्रमाची शानदार उद्घाटन. कणकवली प्रतिनिधी  कणकवली पंचायत समिती नवनिर्वाचित सभापती सौ हर्षदा वाळके, यांचा नांदगाव गावाला प्रथमच सभापती पद मिळाल्याने समस्त नांदगाव वासियांतर्फे सत्काराचा भव्य दिव्य कार्यक्रम नांदगाव ग्रामपंचायत च्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता.तसेच कासार्डे जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, नांदगाव गावची सुकन्या तसेच वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.२ जिल्हा परिषद सदस्या सौ. रिद्धी सुतार तसेच कासार्डे पंचायत समिती सदस्य सहदेव उर्फ अण्णा खाडये या सर्वांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, कल्पवृक्ष देवून सत्कार गावाच्या वतीने करण्यात आला.        कार्यक्रम सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने सुरुवात करण्यात आली.      ...

सिंधुदुर्ग today

इमेज
समस्त नांदगाव गावाच्या वतीने नवनिर्वाचित सभापती सौ हर्षदा वाळके यांचा झाला सन्मान.  जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचाही झाला सत्कार.  जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा राज्य गीताने कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन. कणकवली प्रतिनिधी  कणकवली पंचायत समिती नवनिर्वाचित सभापती सौ हर्षदा वाळके, यांचा नांदगाव गावाला प्रथमच सभापती पद मिळाल्याने समस्त नांदगाव वासियांतर्फे सत्काराचा भव्य दिव्य कार्यक्रम नांदगाव ग्रामपंचायत च्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता.तसेच कासार्डे जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, नांदगाव गावची सुकन्या तसेच वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.२ जिल्हा परिषद सदस्या सौ. रिद्धी सुतार तसेच कासार्डे पंचायत समिती सदस्य सहदेव उर्फ अण्णा खाडये या सर्वांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, कल्पवृक्ष देवून सत्कार गावाच्या वतीने करण्यात आला.        कार्यक्रम सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने सुरुवात करण्यात आली.        ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील श्रीराम मंदिर चा सुवर्ण महोत्सवी निमित्त विविध कार्यक्रम.  राम नाम लेखन ,चित्रकला , पाककला, वेशभूषा स्पर्धांचे आयोजन. उद्या संतोष जोईल विरुद्ध समीर कदम डबलभारी भजनाचा सामना.  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील नांदगाव मोरयेवाडी येथील श्रीराम मंदिर च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्री राम नाम लेखन,चित्रकला, पाककला, वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर उद्या बुधवार दिनांक २५ मार्च रोजी रात्री ठिक ९ वा. बुवा श्री. संतोष जोईल विरुद्ध समीर कदम यांच्या डबलभारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे.     तसेच श्री राम नवमी उत्सव दिवशी सकाळी ८ वा. श्रींची पुजा , सकाळी १० वा.किर्तन सौ. आरती बापट नारिंग्रे देवगद , १२.४० श्री राम जन्मोत्सव दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. महिलांचे भजन, सायंकाळी ६ वेशभूषा स्पर्धा, सायंकाळी ७ वाजता श्री राम पालखी सोहळा मिरवणूक, रात्री ११ वा. अमृथनाथ सिध्देश्वर दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ला यांचा भव्य नाट्य प्रयोग होणार आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याची मागणी मुंबई :दि.२३ :  महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी केंद्रीय मंत्री, पंचायती राज तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय,राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह जी यांच्या कडे  सविस्तर पत्र पाठवून केली आहे. राज्यातील 136 मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या सुमारे 7,550 यांत्रिक मासेमारी नौकांसाठी डिझेल कोटा मंजूर असला तरी प्रत्यक्षात वाढत्या दरांमुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारांमुळे डिझेल दरात झालेली वाढ ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. सहकारी संस्थांना ‘बल्क कन्झ्युमर’ म्हणून वर्गीकृत केल्याने मच्छीमारांना किरकोळ दरांपे...