पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
सुधारित पीक विमा योजनेचा सर्व  शेतकऱ्यांनी  ३१ जुलै पूर्वी लाभ घ्यावा  शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक  पीक विमा काढल्यानंतर ई पीक पाहणी करणे अनिवार्य  आहे. कणकवली प्रतिनिधी  राज्यात २०२६- २७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू झाली असून, भात शेती उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  मंडळ कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांनी केले आहे पत्रकात श्री. अर्जुन जाधव यांनी म्हटले आहे की. राज्यात २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सधारित प्रधानमंत्र पीक विमा योजना ३ जुलैपासून लागृ केली आहे. यामळे अधिसचित महसूल मंडळात, अधिसूचित पिकाचे चाल वर्षीाचे सरासरी उत्पादन हे उंबरठ उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास विमा नुकसान भरपाई" लागू होणार आहे. भात व नागली पिकांसाठी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के विमा हप्ता भरून सहभाग घ्यावा लागेल.  अंतिम तारीख ३१ जुलै आहे. केंद्राच्या पीक विमा पोर्टल व' ऑनलाईन सहभाग नोंदविता येईल. यात बँक, कॉमन सर्विस सेंटर, किंवा स्वतः शेतकरी...

सिंधुदुर्ग today

इमेज
  उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची  घेतली भेट कणकवली/प्रतिनिधी   श्री व सौ राजेंद्र पेडणेकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी आरती देसाई साहेब यांची नुकतीच भेट घेतली अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायती च्या मालकी च्या जागेतील जेष्ठ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते श्री  राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी इमारती मधील व्यावसायिक सौ ऋणाली राजेंद्र पेडणेकर यांच्या समवेत भेट घेतली,  यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी इमारती संदर्भात सविस्तर चर्चा सुध्दा केली, आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी इमारती व जागे संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली,  यावेळी निवेदन सादर करण्यात आले, तसेच सौ व श्री ऋणाली राजेंद्र पेडणेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन ,निवासी जिल्हाधिकारी आरती देसाई साहेब यांचा सन्मानित केले, तसेच पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या,  या निवेदनात असे म्हटले आहे, कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे असलेले नगरपंचायत मालकीचे व्यापारी मार्केट ( पुर्वी चे भाजी मार्केट) मधील स्लॅब ची इमारत पूर्णतः कोसळण्याच्या मार्गावर असून, पहिल्या मजल्यावरील भिंती, छप...

सिंधुदुर्ग today

इमेज
कर्जमुक्तीची व्यापकता वाढली;दोन लाखांचे कर्ज सर्वांना माफ. सिंधुदुर्ग today: (ऋषिकेश मोरजकर ) शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, उत्पादन खर्चातील सातत्याने होणारी वाढ आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे ही केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक जबाबदारी असल्याची भूमिका राज्य शासनाने सातत्याने घेतली आहे. त्याच भूमिकेचा अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक आविष्कार म्हणजे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना'. या योजनेची नुकतीच घोषणा करण्यात आली.दरम्यानच्या काळात विविध लोकप्रतिनिधीनी या घोषणेचे स्वागत करताना काही नोंदी व सूचना केल्या होत्या.हजारो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या योजनेतून कोणीही पात्र लाभार्थी अटी व शर्तीमुळे वंचित राहून यासाठी लगेच या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत आणखी काही महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर करून तिची व्...

सिंधुदुर्ग today

इमेज
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला सावंतवाडी मतदार संघाचा आढावा दोडामार्ग आणि सावंतवाडी तहसील कार्यालयात घेतली  आढावा बैठक कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर करणार कठोर कारवाई सिंधुदुर्गनगरी, दि. ६ (ऋषिकेश मोरजकर) :  लोकशाही व्यवस्थेचा पाया अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम–२०२६ अंतर्गत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. सावंतवाडी व दोडामार्ग तहसील कार्यालयांना भेट देत त्यांनी अभियानाच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती घेतली तसेच मतदार यादीतील प्रत्येक नोंद अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त राहील, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. या कामात निष्काळजीपणा अथवा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO), मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि पर्यवे...

सिंधुदुर्ग today

इमेज
आजच्या अस्वस्थ काळाला तुकाराम हेच उत्तर - डॉ. राजन गवस. ॲड. देवदत्त परुळेकर लिखित 'आजच्या काळासाठी तुकाराम' ग्रंथावर परिसंवाद. रसिकांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. कणकवली, प्रतिनिधी      काळ नेहमीच वाईट असतो, तरीही अशा काळाला उत्तर असतेच. आज सर्वत्र माणसाच्या मनात अस्थिरता आणि अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थतेला उत्तर म्हणजे `तुकाराम' आहे. ॲड. देवदत्त परुळेकर लिखित आणि प्रभा प्रकाशन प्रकाशित `आजच्या काळासाठी तुकाराम हा ग्रंथ यासंदर्भात मौलिक मार्गदर्शक आहे. सिंधुदुर्गसह संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये या ग्रंथाची लघु आवृत्ती वितरित व्हायला हवी. नव्या पिढीला तुकाराम कळणे म्हणजेच त्यांचे जगणे विवेकशील बनविणे होय. परुळेकर यांच्या वर्तन आणि लेखनात कोणताही फरक नाही. म्हणूनच हा महत्त्वाचा ग्रंथ ते लिहू शकले, असे प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार आणि विचारवंत डॉ. राजन गवस यांनी केले.         कणकवलीच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ॲड. देवदत्त परुळेकर लिखित `आजच्या काळासाठी तुकाराम' या ग्रंथावरील परिसंवाद मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण सभागृहात डॉ. रा...

सिंधुदुर्ग today

इमेज
  स्कॉलरशिप परीक्षेत पाचवीतील मीरा सामंत जिल्ह्यात प्रथम. सिंधुदुर्ग /प्रतिनिधी  शैक्षणिक वर्ष 2025/2026 स्कॉलरशिप परीक्षेत पाचवीत इयत्ते मधून कुडाळची मीरा महादेव सामंत ही विद्यार्थिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.     तीच्या या यशाबद्दल कुडाळ येथील सामंत परिवार तसेच नांदगाव येथील मोरये परिवार यांनी अभिनंदन केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
केवळ नोकरीवर अवलंबून न राहता मुलांनी व्यवसाय क्षेत्रातही गरुडझेप घ्यावी - उमेश तोरसकर. कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने 'पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या गौरव सोहळा ; स्पर्धात्मक विभाग टिकण्यासाठी शैक्षणिक उन्नती साधा. कणकवली : प्रतिनिधी   पत्रकार अहोरात्र समाजासाठी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असतो. समाजाला वेळ देताना अनेकदा स्वतःच्या कुटुंबाकडे आणि मुलांकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीतही पत्रकारांच्या मुलांनी जिद्दीने अभ्यासात मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मुलांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसाय क्षेत्रातही गरुडझेप घ्यावी, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांनी येथे केले. कणकवली पंचायत समितीच्या सभागृहात कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके,उपाध्यक्ष संतोष राऊळ,  ज्येष्ठ...