सिंधुदुर्ग today
धार्मिक उन्मादी राजकारणाला साहित्यिकांचेही प्रोत्साहन आंबेडकर चौक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अजय कांडर यांचे प्रतिपादन साहित्य संमेलनाला साहित्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी/प्रतिनिधी सत्ताधारी आणि साहित्यिक यांची युती निकोप समाजासाठी धोकादायक असून आता सत्ताधाऱ्यांच्या धार्मिक उन्मादी राजकारणाला साहित्यिकांचेही प्रोत्साहन मिळत आहे. अशा काळात व्यवस्थेला शरण न जाणार लेखक कवीच यापुढे चांगलं लेखन करू शकतो. नाटककार कवी सिद्धार्थ विष्णू तांबे हे या प्रकारचे लेखन करणारे महत्त्वाचे लेखक होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आयोजित केले गेलेले आंबेडकर चौक साहित्य संमेलन ही महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी पहिल्या आंबेडकर चौक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले. सिंधुदुर्ग सुपुत्र नाटककार कवी सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात पहिले आंबेडकर चौक साहित्य संमेलन कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित...