पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
पेन्शनर असोसिएशन सभेत विविध विषयावर चर्चा कणकवली/प्रतिनिधी        येथील पेन्शन असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पेन्शनर असोसिएशन सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली आणि काही ठोस निर्णय घेण्यात आले.    सदर सभेत पुढील प्रमाणे महत्त्वाचे ठराव व निर्णय घेण्यात आले. पेनशर भवनची मासिक सभा दरमहाचे दहा तारीख ऐवजी दरमहाच्या  5 तारीखला सकाळी 10.30 वा.घेण्यात येईल.पेन्शनर भवनकडे जाणारी पायवाट आहे, ती ग्रामपंचायत कलमठने तेथे पायऱ्या व रॅम्प बांधून देण्याचे काम मंजूर केले.त्यासाठी रु.60000 निधी  उपलब्ध होताच काम सुरू करुन पूर्ण करून देण्यात येईल असे आश्वासन ग्रामपंचायत अधिकारी व संरपच यांनी दिले. त्याची माहिती सभेत देण्यात आली. याबाबत अभिनंदनचा ठराव घेण्यात आला.गुरु शिष्य प्रेम पत्र स्पर्धेत पारितोषिक प्राप्त झाल्या बद्दल संघटनेच्या पदाधिकारी सुगंधा देवरुखकर यांचे सभेत अभिनंदन करण्यात आले. त्याच बरोबर सुगंधा देवरुखकर यांनी 1 लाख रक्कमेची फिक्स डिपॉझिट करून त्याच येणारे तिमाही व्याज 2686 रुपये पेन्शनर संघटनेच्या कामकाजासाठी  व त्यांच्या पश्चात...

सिंधुदुर्ग today

इमेज
कुठल्याही भेदाच्या पलीकडली परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा  कवी अजय कांडर, कवयित्री संध्या तांबे यांच्या उपस्थितीत गुरु शिष्य पत्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ  पल्लवी शिंदे माने,मालिनी लाड, तनया पाटील यांचे लेखन सर्वोत्कृष्ट साद फाउंडेशनच्या उपक्रमाला विदेशासह- महाराष्ट्रभरातून उस्फूर्त प्रतिसाद  कणकवली/प्रतिनिधी    आपल्या संस्कृतीत गुरु शिष्य परंपरा फार प्राचीन आहे.मात्र भेदाच्या पलीकडे ज्या गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व जाणले गेले त्याच गुरु शिष्य परंपरेची महती वाढत गेली. संगीत आणि शिक्षण क्षेत्रात तर अशा गुरु शिष्य परंपरेला मोठा वारसा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर साद फाउंडेशनने आयोजित केलेली ही गुरु शिष्य प्रेम पत्र लेखन स्पर्धा फार महत्त्वाची असून याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद थक्क करणारा होता असे प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर आणि सुप्रसिद्ध कवयित्री संध्या तांबे यांनी येथे केले.      ' साद फाउंडेशन सिंधुदुर्ग' ने आयोजित केलेल्या खुल्या गुरु शिष्य प्रेम पत्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कवी अजय कांडर आणि कवयित्री संध्या तांबे यांच्...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथे मावळे आम्ही स्वराज्याचे यांच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव होणार साजरा. विविध कार्यक्रमांचे आयोजन सिद्धी गणपती फुगडी मंडळ कुडाळ याची होणार पारंपरिक फुगडी. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथे मावळे आम्ही स्वराज्याचे  यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त  शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सिद्धी गणपती फुगडी मंडळ कुडाळ यांच्यावतीने पारंपरिक फुगडी कार्यक्रम रात्री ८ वा. होणार आहे.      कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी ८ वा:- श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक आणि महाआरती , सकाळी १० वा:- भगव्या ध्वजाचे पूजन सकाळी १०.३० वा:- ढोल वादन, दुपारी १२ वा:- सुस्वर स्थानिक भजने, दुपारी ३ वा:- महिलांसाठी हळदीकुंकू सायंकाळी ६ वा:- स्थानिक पालकांचे सत्कार , रात्री ८ वा:- पारंपरिक फुगडी कार्यक्रम  सिद्धी गणपती फुगडी मंडळ कुडाळ अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मावळे आम्ह...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी अजय कांडर यांच्या कवितेचा एसएनडीटी विद्यापीठाच्या बीएच्या अभ्यासक्रमात समावेश 'आवानओल ' काव्यसंग्रहातील 'झडत गेलेल्या  झाडाविषयीची गोष्ट' कवितेचा गौरव कणकवली/प्रतिनिधी      कवी अजय कांडर यांच्या 'आवानओल ' या बहुचर्चित काव्यसंग्रहातील 'झडत गेलेल्या झाडाविषयीची गोष्ट ' या कवितेचा एसएनडीटी विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी विविध विद्यापीठांच्या अकरा अभ्यासक्रमांमध्ये आणि आणि एका शालेय अभ्यासक्रम कवी अजय कांडर यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.     कवी अजय कांडर हे 90 नंतरच्या पिढीतील मराठी कवितेतील महत्त्वाचे कवी म्हणून ओळखले जातात. 'आवानओल, हत्ती इलो,युगानुयुगे तूच, अजूनही जिवंत आहे गांधी ' हे त्यांचे चार काव्यसंग्रह प्रसिद्ध असून आवानओल हा काव्यसंग्रह 2005 मध्ये प्रसिद्ध झाल्यावर गेल्या वीस वर्षात वेगवेगळ्या कारणाने मराठी कवितेच्या केंद्रस्थानी चर्चिला जात आहे. यापूर्वी या संग्रहातील अनेक कवितांचा विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यात आला.त्यातही या संग्रहातील 'बाया पाण्याशीच बोलतात ...

सिंधुदुर्ग today

इमेज
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे १५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर कणकवली : राज्याचे  मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे रविवारी १५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे -  सकाळी १०.४५ वा. मुंबई येथून मोटारीने जुहू विमानतळाकडे प्रयाण,  सकाळी ११.०० वा. पवनहंस, जुहू विमानतळावरून हेलिकॉप्टरने (VT-DBH) देवगडकडे प्रयाण,  दुपारी १२.१५ वा. एस. एच. केळकर कॉलेज, देवगड येथे हेलिकॉप्टरने आगमन, दुपारी १२.३० वा. श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे (दक्षिण काशी) यात्रा निमित्त दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत, दुपारी १.३० वा. मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण,  दुपारी २.०० वा. एस. एच. केळकर कॉलेज येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण, दुपारी ३.१५ वा. पवनहंस, जुहू विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर मोटारीने अधिश निवासस्थान येथे प्रस्थान केले जाईल, असा दौरा संपन्न होणार आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य - पालकमंत्री नितेश राणे ६०० कोटींचा प्रारुप आराखडा  दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार ; सिंधुदुर्ग जिल्हा जलवाहतुकीने मुंबईशी जोडणार अवैध धंद्यांना आळा घालणार सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (ऋषिकेश मोरजकर):  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणकारी  निर्णय घेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जात असून, मंजूर निधी वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही विभागाने निधी अखर्चित ठेवू नये, अन्यथा पुढील वर्षी अतिरिक्त निधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपवनसंरक्षक श्री....

सिंधुदुर्ग today

इमेज
  कवी विठ्ठल कदम यांना कवी नारायण सुर्वे पुरस्कार  नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त नवी मुंबईच्या संस्थेतर्फे कदम यांचा गौरव. सावंतवाडी/प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्रोही सांस्कृतिक चळवळ पुढे घेऊन जाण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे अग्रगण्य कार्यकर्ते आणि प्रसिद्ध कवी विठ्ठल कदम यांना कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त देण्यात येणारा कवी नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर झाला आहे. नवी मुंबई येथील साहित्य रसिक संस्थेतर्फे कवी सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय काव्य पुरस्कार योजना आयोजित करण्यात आली होती. यात कवी कदम यांच्या 'फाळ ' या कवितेला नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दीड हजार रुपये ,स्मृतीचिन्ह , मानपत्र आणि ग्रंथ अशा स्वरूपाच्या या पुरस्कारासाठी पुरस्कार योजनेचे परीक्षक मराठी आणि हिंदीतील ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ. दामोदर मोरे यांनी कदम यांच्या 'फाळ ' या कवितेची सर्वोत्कृष्ट कविता म्हणून निवड केली.       कविवर्य नारायण सुर्वे हे सिंधुदुर्गचे सुपुत्र. वैभववाडी तालुक्यातील हेत हे त्या...