सिंधुदुर्ग today
संत नामदेवानी मालवणी गौळण लिहून. भाषेचे महत्त्व पटवून दिले - अजय कांडर. कवी अमेय मुळे यांच्या काव्यसंग्रहाचे कणकवलीत प्रकाशन. कणकवली/प्रतिनिधी संत नामदेव महाराज हे शिंपी समाजाचे आराध्य दैवत आहेत. पण याच संत नामदेव महाराजांनी मालवणी गवळण लिहून आपल्याला भाषेचे महत्त्व पटवून दिल.संत नामदेव महाराज यांच्या विचारांची संवेदनशीलता मालवणी मुलखातील कवी अमेय मुळे यांच्या कवितेत सापडते. त्यांनी अधिक गंभीरपणे भविष्यात काव्य लेखन केले तर त्यांच्या काव्य लेखनाचा पुढील प्रवास अतिशय उज्वल आहे असे प्रतिपादन नामवंत कवी आणि प्रसिद्ध स्तंभ लेखक अजय कांडर यांनी येथे केले. हिंदू प्रकाशनने प्रकाशित केलेल्या कणकवली शहरातील कवी अमेय मुळे यांच्या 'काही ओलावलेली पाने ' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवी कांडर यांच्या हस्ते करण्यात आले.'शिंपी समाज ऐक्यवर्धक संघ, कणकवली'तर्फे कणकवली शिवाजीनगर येथील संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अभिनेते अभय खडपकर, सुहास वरुणकर, दयानंद मनोहर मुळे, ममता दयानंद मुळे, विन...