पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
  संत नामदेवानी मालवणी गौळण लिहून. भाषेचे महत्त्व पटवून दिले - अजय कांडर. कवी अमेय मुळे यांच्या काव्यसंग्रहाचे कणकवलीत प्रकाशन. कणकवली/प्रतिनिधी        संत नामदेव महाराज हे शिंपी समाजाचे आराध्य दैवत आहेत. पण याच संत नामदेव महाराजांनी मालवणी गवळण लिहून आपल्याला भाषेचे महत्त्व पटवून दिल.संत नामदेव महाराज यांच्या विचारांची संवेदनशीलता मालवणी मुलखातील कवी अमेय मुळे यांच्या कवितेत सापडते. त्यांनी अधिक गंभीरपणे भविष्यात काव्य लेखन केले तर त्यांच्या काव्य लेखनाचा पुढील प्रवास अतिशय उज्वल आहे असे प्रतिपादन नामवंत कवी आणि प्रसिद्ध स्तंभ लेखक अजय कांडर यांनी येथे केले.       हिंदू प्रकाशनने प्रकाशित केलेल्या कणकवली शहरातील कवी अमेय मुळे यांच्या 'काही ओलावलेली पाने ' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवी कांडर यांच्या हस्ते करण्यात आले.'शिंपी समाज ऐक्यवर्धक संघ, कणकवली'तर्फे कणकवली शिवाजीनगर येथील  संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अभिनेते अभय खडपकर, सुहास वरुणकर, दयानंद मनोहर मुळे, ममता दयानंद मुळे, विन...

सिंधुदुर्ग today

इमेज
  अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत - कृष्णात खोत. कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशन. प्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती. कणकवली/प्रतिनिधी  'काहूर ' म्हणजे मनातील वादळ. हे वादळ थांबविण्याची ताकद कवितेच्या शब्दात असते. मन मोकळे करून वेदनेला आणि आतल्या आपल्या दुःखाला समजून घेण्याचेही काम कविता करत असते. त्यामुळेच कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता वाचकाच्याही मनातील वेदना मोकळी करते. आतल्या अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत असते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार कृष्णात खोत यांनी येथे केले.           येथील कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'रावा प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या 'काहूर' काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कृष्णात खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कादंबरीकार उषा परब, कवी अजय कांडर, समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर उपस्थित होते.  तर कणकवली शिक्षण संस्थेचे पदाधिकारी डॉ. धनश्री तायशेटे सावंत, ...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवलीत 'निवृत्ती दाभोळे स्मृती संगीत समारोह' शनिवारी. संगीत विशारद गायकांची रंगणार मैफल. सिंधुदुर्गातील रसिकांना अनोखी संगीत पर्वणी. कणकवली/ प्रतिनिधी          संगीततज्ज्ञ  निवृत्ती दाभोळे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त कणकवलीत शनिवार दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी 'निवृत्ती दाभोळे स्मृती संगीत समारोह' आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील संगीत साधकांसाठी दर्जेदार मंच उपलब्ध करून देणे आणि शास्त्रोक्त संगीताचा प्रसार करणे हा या सोहळ्याचा उद्देश आहे.गंधर्व फाउंडेशन, कणकवली तथा कै. निवृत्ती दाभोळे शिष्यवृंद आणि मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम कणकवली कॉलेज येथील एचपीसीएल हॉलमध्ये सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे.     आदर्श संगीत विद्यालय कणकवलीच्या विशारद पदवीधर शिष्यांची या कार्यक्रमात खास मैफल रंगणार आहे. सौ. मृणाल गांवकर, सौ. नेहा देशपांडे, कु. मिनल केळूसकर आणि कु. विदिता जोशी या गायिका शास्त्रोक्त गायन, नाट्यपद आणि अभंग गायन सादर करणार आहेत. त्यांना श्री. संदिप पेंडुरकर संवादिनीवर आणि वैभव सुतार तबल्यावर साथसंगत करणार आहेत. ध्वनी व...

सिंधुदुर्ग today

इमेज
  माजी पं.स.सदस्य गणेश तांबे यांना पितृषोक. कणकवली/प्रतिनिधी      भरणी येथील माजी भारतीय सैनिक कै. आप्पा बाबू तांबे (95) यांचे शुक्रवार 14 ऑगस्ट रोजी रात्रौ 10:45 वा. वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.      तत्कालीन चीन आणि बांगलादेश युद्धामध्ये आप्पा तांबे हे भारतीय सैन्यामध्ये सहभागी झाले होते. 1973 साली ते भारतीय सैन्यातून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. शनिवार 15 ऑगस्ट रोजी भरणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भरणी गावचे माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य, कणकवली शेतकरी खरेदी-विक्री संघाचे संचालक  गणेश तांबे यांचे ते वडील होत.

सिंधुदुर्ग today

इमेज
  'आजच्या काळासाठी तुकोबा' या ग्रंथावरील परिसंवादात बोलताना डॉ. रणधीर शिंदे, बाजूला सुभाष विभुते, अजय कांडर आणि ॲड. देवदत्त परुळेकर. आजच्या काळासाठी तुकोबा  ग्रंथात समकाळाचा आवाज - डॉ. रणधीर शिंदे. ॲड. देवदत्त परुळेकर लिखित, प्रभा प्रकाशन प्रकाशित 'आजच्या काळासाठी तुकोबा' या ग्रंथावर आजरा येथे परिसंवाद. परिसंवादाला वारकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद. कणकवली / प्रतिनिधी           कोणतेही संत साहित्य हे त्या-त्या काळाला समजून घेण्यासाठी लिहिले जायला हवे. ॲड. देवदत्त परुळेकर यांनी लिहिलेला 'आजच्या काळासाठी तुकोबा' हा ग्रंथ या अर्थाने समकाळाचा आवाज आहे. आजच्या काळातील अगदी महत्त्वाची उदाहरणे देऊन अतिशय सोप्या भाषेत तुकाराम महाराजांचे विचार समाजाला त्यांनी समजावून सांगितले आहेत. तुकाराम महाराजांचे विचार अशा पद्धतीने लेखनातून समाजापर्यंत पोहोचवणे ही मौलिक साहित्यकृती आहे. आपल्यातील विकारांपासून दूर जाण्यासाठी आणि आपले वैयक्तिक जीवन अधिक समृद्ध करत विवेकाच्या मार्गावर पोहोचण्यासाठी हा ग्रंथ प्रत्येकाने वाचायला हवा, असे प्रतिपादन नामवंत समीक्षक तथा शिवाजी वि...

सिंधुदुर्ग today

इमेज
मंत्री नितेश राणेंच्या संवादाचा ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’; उपोषणकर्त्यांची संख्या १५० वरून थेट २० वर. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला उपोषण कर्त्यांसोबत पालकमंत्र्यांनी बांधला होता संवाद सेतू.  स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात बदलत्या सकारात्मक  मानसिकतेचे दर्शन. पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने उपोषणाऐवजी संवादाला पसंती. सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर) स्वातंत्र दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपोषणकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन उपोषण करणारे फक्त २० लोक आपले प्रश्न घेऊन बसले होते. प्रतिवर्षी १०० ते १५० उपोषण करणाऱ्या ची ही संख्या फक्त २० वर आल्याने पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हा प्रशासनाच्या संवादातून प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. जनतेने हक्कासाठी उपोषणाची नोटीस दिल्यानंतर  त्याची दखव पालकमंत्री नितेश राणे यांनी घेत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या उपोषणकर्त्यांशी केलेला संवाद आणि  प्रशासनाला दिलेल्या योग्य सूचना यामुळे अनेक उपोषणकर्त्यांचे समाधान झाले आहे. उपोषण कर्त्या व्यक्तींनी  पालकमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्...

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे पोलीस पाटील पदाचा  नांदगाव पोलीस पाटलांकडे अतिरिक्त कार्यभार. कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी काढले आदेश. ग्रामस्थांनी नुतन पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचे केले स्वागत.  कणकवली : प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील असलदे गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार आता नांदगाव येथील पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांच्याकडे देण्यात यावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. याबाबत कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी आदेश दिले आहे.त्यानुसार असलदे पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचा असलदे ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करत सरपंच चंद्रकांत डामरे , चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते शाल , पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.  असलदे ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशसेवा करणा-या भारतीय सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्यात आली. त्यानंतर प्रभारी पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच सचिन परब , व्हा. चेअरमन दयानंद हडकर ,तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीकृष्ण परब, सोसायटी संचालक शत्...