सिंधुदुर्ग today
चांगल्या साहित्याचा निकष पुरस्काराने ठरत नसतो - कवी अजय कांडर. कणकवली महाविद्यालयाच्या लेखन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद. कणकवली/ प्रतिनिधी चांगल्या कवितेसाठी कवितेचे तंत्र महत्त्वाचं नसून कवितेचा आशय महत्वाचा ठरतो.कवितेचे तंत्र शिकून चांगली कविता लिहिता येत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही चांगल्या साहित्याचा निकष साहित्यिकाला मिळालेल्या पुरस्काराने ठरत नाही. तर चांगला अभिजीत वाचक ज्या साहित्याला मिळतो ते लेखन उत्तम समजावे.यामुळे नव्या कवीनी कोणत्याही प्रकारचं साहित्य लेखन करताना लेखन ही आपल्या अभिव्यक्तीची गरज आहे, या जाणिवेतूनच लेखन करावे असे प्रतिपादन नामवंत कवी आणि प्रसिद्ध स्तंभ लेखक अजय कांडर यांनी येथे केले. कणकवली महाविद्यालयाच्या कणक नियतकालिक विभागातर्फे कविता ललित आणि कथा साहित्य प्रकाराची कार्यशाळा महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी बोलताना कांडर यांनी कवीचा किंवा लेखकाचा जेवढा व्यक्तिगत संघर्ष तेवढी त्याची उत्तम लेखन करण्याची शक्यता जास्त. सुखशांती जीवन जगून उत्तम लेखन करता येत नाही असेही आग्रहणे सांगितले. म...