पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
संध्या सामंत सावंत यांचा लोकमत सखी जनसेवा पुरस्काराने गौरव. सामाजिक कार्याच्या योगदानाची दखल. कणकवली / प्रतिनिधी      मूळच्या झाराप येथील आणि सध्या ठाण्यात कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका संध्या सामंत-सावंत यांना 'लोकमत सखी जनसेविका सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.      त्या गेली १५ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून २०१८ मध्ये त्यांनी मातृसेवा फाउंडेशनची स्थापना केली. महिला, बालविकास, शिक्षण, स्वावलंबन आणि सक्षमीकरण या क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. ठाणे ते सिंधुदुर्गातील वंचित मुलांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवणे, तसेच महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम त्या करतात. त्यांच्या प्रयत्नातून ठाणे पाचवड आदिवासी भागातील ३०हून अधिक आदिवासी महिला साक्षर झाल्या असून घरकाम करणाऱ्या महिला, पोलीस महिला आणि रेड लाईट एरियामधील महिलांसाठीही त्यांनी भरीव योगदान दिले आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक शिक्षणापासून वंचित मुलांना त्यांनी शिक्षण प्रवाहात आणले आहे.लोकमत समूहाच्या 'सखी मंच'द्वारे समाजसेवा आणि व...

सिंधुदुर्ग today

इमेज
शैक्षणिक उपक्रमातून सामाजिक संस्थांनी केलेली गुंतवणूक आदर्शवत – हर्षदा वाळके. नांदगाव पंचक्रोशीतील प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ;  प्राण जीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपक्रम.  कणकवली : प्रतिनिधी  प्राण जीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वह्या वाटपाच्या उपक्रमात मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, तो आम्हाला दिसत आहे. मुलांची प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा विकास होण्यासाठी हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी हा वह्या वाटपाचा उपक्रम होत आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात पत्रकार भगवान लोके यांच्या प्रमाणे आपल्या लाल मातीबद्दल मोठे झाल्यानंतर नेहमी आत्मियतेने जिव्हाळा जपला पाहिजे. त्यातून असे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम होतात.शैक्षणिक उपक्रमातून प्राण जीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थांनी केलेली गुंतवणूक आदर्शवत असल्याचे प्रतिपादन सभापती हर्षदा वाळके यांनी केले. प्राण जीवन संयोग संस्थेचे अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने  व...

सिंधुदुर्ग today

इमेज
ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी व गणेशोत्सव शांततेत साजरे करा. जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे आवाहन. सिंधुदुर्गनगरी, दि. २४ : (ऋषिकेश मोरजकर) ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी आणि गणेशोत्सव हे विविध धर्मीयांच्या श्रद्धेशी निगडित महत्त्वाचे सण एकाच कालावधीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व समाजघटकांनी परस्परांच्या श्रद्धा व भावनांचा आदर राखत सण-उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरे करावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी हॉल येथे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत आगामी सण-उत्सवांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, मिरवणुका, ध्वनिप्रदूषण तसेच सामाजिक सलोखा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्यासह पोलीस, वाहतूक, राज्य परिवहन विभाग आणि अशासकीय सदस्य उपस्थित होते.  दोन्ही धर्मांचे सण जवळच्या कालावधीत येत असल्याने एकमेकांच्या श्रद्धांचा सन्मान राखून सण साजरे क...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली महाविद्यालयातर्फे उद्या साहित्य लेखन कार्यशाळा अजय कांडर, डॉ. सई लळीत, डॉ.अनिल फराकटे यांचे मार्गदर्शन. कणकवली/प्रतिनिधी          कणकवली महाविद्यालयाच्या  'कनक' नियतकालिक विभागाच्या वतीने मंगळवार 25 ऑगस्ट रोजी स.10 वा. जिल्हास्तरीय साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्र.प्राचार्य डॉ. युवराज महालिंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शाळेसाठी नामवंत कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर, मालवणी लेखिका - कवयित्री डॉ.सई लळीत आणि सुप्रसिद्ध स्तंभ लेखक डॉ. अनिल फराकटे यांना मार्गदर्शन साठी निमंत्रित करण्यात आले आहे.      कार्यशाळा कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात होणार असून कार्यशाळेची रूपरेषा पुढील प्रमाणे -सकाळी ८ ते ९ नोंदणी, तर सकाळी ९ ते ९.३० उद्घघाटन.पहिले सत्र - स ९.३० ते १०.३० - काव्य लेखन मार्गदर्शक अजय कांडर.दुसरे सत्र - सकाळी १०.३० ते ११.३० - ललित लेखन मार्गदर्शक डॉ. सई लळीत, तिसरे सत्र - दुपारी ११.४० ते १२.४० - कथात्मक वाङ्ममय.मार्गदर्शक डॉ. अनिल फराकटे, दुपारी १२.४० ते १ प्रमाणपत्र वितरण व समारोप.     ...

सिंधुदुर्ग today

इमेज
  नरडवे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोठा दिलासा..! १५२ कुटुंबांना ६.८३ कोटींचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर; पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीनंतर प्रश्नाला निर्णायक गती. सिंधुदुर्गनगरी  : (ऋषिकेश मोरजकर) नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील पाच गावांमधील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना स्वेच्छा (ऐच्छिक) पुनर्वसन अनुदानापोटी तब्बल ६ कोटी ८३ लाख १ हजार ८८७ रुपयांची रक्कम अदा करण्यास मदत व पुनर्वसन विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी याबाबत मंजुरी दिल्याची माहिती संबंधित पत्राद्वारे राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुमारे दोन आठवड्यांपूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी नरडवे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन त्यांच्या स...

सिंधुदुर्ग today

इमेज
  वैभववाडीत सप्टेंबर मध्ये ‘श्रावणसरी’ काव्यसंमेलन कवी नारायण सुर्वे यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम. वैभववाडी/ प्रतिनिधी      सिंधुदुर्ग सुपुत्र ( वैभववाडी-  हेत) कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंच, वैभववाडी यांच्या वतीने वैभववाडी तालुक्यातील कवी-कवयित्री, साहित्यिक व साहित्यप्रेमींसाठी तालुकास्तरीय ‘श्रावणसरी’ काव्यसंमेलनाचे आयोजन सप्टेंबर महिन्यात करण्यात आले आहे. वैभववाडी तालुक्यातील कवी-कवयित्री, साहित्यिक व साहित्यप्रेमींनी या काव्यसंमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.       सहभागी कवी-कवयित्रींना आपल्या आवडीची एक स्वरचित कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच काव्यसंमेलनाचे स्वरूप खुले ठेवण्यात आले असून, नोंदणी करणाऱ्या पहिल्या ३० कवींना कविता सादरीकरणाची संधी देण्यात येणार असून सहभागी सर्व कवींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.        कविता सादरीकरणासाठी नावनोंदणीची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ आहे. काव्य, साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून त...
इमेज
प्रतिबंधित गुटखा वाहतूकदाराला पुरविल्या प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर. अँड उमेश सावंत यांनी पाहीले काम.  कणकवली : प्रतिनिधी  शासनाने प्रतिबंधीत केलेला ३ लाख ८१ हजार २१६ रुपयांचे गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ बेळगांव ते वेंगुर्ले अशी वाहतूक करून विक्रेत्यांना पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेला ट्रान्सपोर्ट व्यावसायीक मोहन निलेश परब (रा. वेंगुर्ले कॅम्प भटवाडी) याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी ५०० हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी निवती पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी केळुस तिठा येथे वाहन तपासणी करत असताना रात्री ११.३० वा. वेंगुर्ले ते मालवण जाणारी मारूती कार तपासली असता त्यात चार गोण्या पान मसाला व गुटखा आढळून आला. त्यामुळे वाहनचालक रामचंद्र लुडबे व प्रफुल्ल लुडबे यांना ताब्यात घेतले होते. तपासात जप्त मुद्देमाल हा मोहन परब याने त्यांना आणून दिल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आरोपींवर भा.न्या.सं. कलम १२३, २२३. २७१, २७५ व अन्न सुरक्षा अधिनियम कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे ...