सिंधुदुर्ग today
लेखन कार्यशाळेतून आलेले भान हे जीवनाचेही भान असते- डॉ. अनिल फराकटे. कणकवली महाविद्यालयाच्या लेखन कार्यशाळेला डॉ. सई लळीत यांचेही मार्गदर्शन. कणकवली/ प्रतिनिधी वाङ्ममय लेखन कार्यशाळेसारख्या उपक्रमांची आज नितांत गरज आहे. अशा उपक्रमांमुळे संवेदनशील वयातील विद्यार्थी ललित साहित्याशी जोडले जातात. लेखन कार्यशाळेतून आलेले भान हे जीवनाचेही भान असते असे प्रतिपादन प्रसिद्ध स्तंभ लेखक आणि कथाकार प्रा. डॉ. अनिल फराकटे यांनी केले. कणकवली कॉलेजमध्ये कनक नियतकालिक विभागातर्फे जिल्हास्तरीय वाङ्मय लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.यात ‘कथात्म वाङ्ममय’ या विषयावर प्रा. फारकटे यांनी मार्गदर्शन केले. वाङ्ममय लेखन सत्राच्या अध्यक्षस्थानी ‘कनक’चे संपादक डॉ. सोमनाथ कदम होते.तर याच वेळी ललित लेखन या विषयावर मार्गदर्शन ललित लेखिका डॉ. सई लळीत यांनी केले. यावेळी प्राचार्य युवराज महालिंगे, कविता लेखन सत्राचे मार्गदर्शक कवी अजय कांडर, माजी राजपत्रित अधिकारी सतीश लळीत,पर्यवेक्षक महादेव माने, डॉ.सुरेश पाटील,प्रा. सीमा हडकर, प्रा. स्वीटी जाधव, प्रा. दीपा त...