सिंधुदुर्ग today
अप्रस्थापित लोकांमुळेच भाषा जिवंत - कवी अजय कांडर. मराठी भाषा दिनी कणकवली कॉलेजमध्ये 'मराठी भाषा आणि आपण' विषयावर व्याख्यान. कणकवली/प्रतिनिधी प्रस्थापित लोकांचे जगणे जसे चकचकीत होत जाते तसे आपली भाषाही ते तोलून मापून बोलतात.त्यामुळे प्रस्थापित लोकांपेक्षा अप्रस्थापित लोकच भाषा जिवंत ठेवतात. कष्टकरी,कामगार,गांव गुंड असे लोकही नव्या शब्दांची निर्मिती करत असतात. जो पर्यंत खेड्यापाड्यातील अगळ पगळ बोलणारा वर्ग जास्त आहे तो पर्यंत भाषा जिवंतच राहणार आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर यांनी कणकवली महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिन व्याख्यानात केले. मराठी भाषा दिनानिमित्त कणकवली कॉलेजच्या मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता - हमी कक्ष विभागातर्फे कवी कांडर यांचे 'मराठी भाषा आणि आपण' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना कांडर यांनी इतिहासकार राजवाडे यांनी शंभर वर्षांपूर्वी मराठी भाषेला धोका असल्याचे सांगितले. तरीही भाषा अजून जिवंत आहे. पण बोली संपली तर आपली प्रमाण मराठी भाषा संपवू ...