सिंधुदुर्ग today
विद्यार्थ्यांनी यशाचे सातत्य राखावे - भगवान लोके. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त दहावी , बारावी गुणवंतांचा सत्कार ; असलदे ग्रामपंचायत , विकास सोसायटीच्यावतीने आयोजन कणकवली : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात दहावी , बारावी हे वर्ष महत्त्वाचे असते. असलदे गावातील शैक्षणिक वाटचालीत दहावी , बारावी मध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले यश कौतुकास्पद आहे. असलदे गावाला अभिमान वाटेल असे यश या दहावी , बारावीतील विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. नांदगाव व कोळोशी हायस्कुल मध्ये पहिल्या क्रमांकाचे यश मिळवण्याचे काम मंदार शामसुंदर हडकर ( 91.80 नांदगाव हायस्कुल ) , तेजस्विनी सुनील तांबे ( 79.80 कोळोशी हायस्कुल ) या विद्यार्थ्यांनी केला आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिवशी झालेल्या सन्मानाने प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे अहिल्याबाई होळकर यांचे विचार आणि कार्य आत्मसात करत पुढील जीवनात यशाचे सातत्य राखावे , असे आवाहन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी केले. असलदे ग्रामपंचायत , रामेश्वर विविध कार्यकारी सोसायटी यांच्या ...