सिंधुदुर्ग today
भाषेच्या प्रश्नाशी सर्व समाज जोडला जायला हवा. समाज साहित्य प्रतिष्ठानच्या सत्कार प्रसंगी डॉ दीपक पवार यांचे प्रतिपादन. कणकवली/प्रतिनिधी आपली भाषा संपली तर आपणही संपणार आहोत हे ज्यांना माहित नाही तेच लोक भाषेच्या प्रश्नापासून दूर राहत आहेत. भाषा संपली तर साहित्य संपेलच परंतु आपल्या भाषेची संस्कृती संपून आपणही संपून जाऊ. यामुळे मराठी भाषेच्या प्रश्नाशी सर्व मराठी समाज जोडला जायला हवा असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषा अभ्यास दीपक पवार यांनी येथे केले. समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि सहयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वसई येथे यावर्षीचे पाचवे समाज साहित्य भाषा विचार संमेलन प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम कलमठ गोसावीवाडी अक्षय सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि समाज साहित्य प्रतिष्ठानच्या विश्वस्त, समीक्षक प्रा.संजीवनी पाटील यांच्या हस्ते प्रा.पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ .पवार यांनी भाषेच्या प्रश्नाशी सर्व साह...