पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
नुतन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर यांची संदेश पारकर यांनी घेतली भेट.  पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा. कणकवली प्रतिनिधी  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर नुकतीच उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुप्षगुच्छ देवून स्वागत केले आणि शुभेच्छा ही  दिल्या.       मावळते सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या बदलीनंतर या ठिकाणी जिल्हा पोलिसअधीक्षक म्हणून डॉ.मोहन दहिकर यांनी पदभार स्वीकारला आहे. नुकतीच उबाठा शिवसेना नेते व जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी त्यांची भेट घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
  जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात. शिवस्वराज्य दिनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन. सिंधुदुर्गनगरी दि 06 (ऋषिकेश मोरजकर) छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे शिवस्वराज्य दिन, आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.           जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशव्दारामध्ये भगवा स्वराज्य ध्वजसंहितेनुसार ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक डॉ. माणिक दिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशक राजदंड व गुढीचे पूजनही करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, विशाल तनपुरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राज्यगीत आणि राष्ट्रगीताने झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक करून स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने 2021 पासून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हण...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथे हायवे सर्विस रस्त्याला खड्डेच खड्डे  वाहनधारकांची डोकेदुखी वाढली ; खड्डे न बुजविल्यास वृक्षारोपण.  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा हा महत्त्वाचा टप्पा आहे. याच नांदगाव तिठ्यावरुन बरीच वाहतूक होत असते देवगड निपाणी राज्य महामार्ग मध्य भागातून गेलेला आहे. अशातच गेले काही महिने हायवे सर्विस रस्त्याला खड्डेच खड्डे पडले असून याचा फटका वाहनधारक विशेषता दुचाकीस्वार यांना बसत आहे.      आता पावसाळा सीजन चालू झाल्यामुळे या खड्ड्यात पाणी साचून या खड्ड्यांची वाढ आणखीन होत आहे. तरी संबंधित विभागाने सदर खड्डे त्वरित बुजवावे अन्यथा त्या खड्ड्यांवर वृक्षारोपण करून आंदोलन केले जाईल. असा इशारा तेथील नागरिकांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
  बाबुराव बागुल कथा पुरस्कार लेखक महावीर कांबळे यांना जाहीर सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे पुरस्काराचे आयोजन एकूण ७० कथांमधून महावीर कांबळे यांच्या मोर्चा कथेची पुरस्कारासाठी निवड कणकवली / प्रतिनिधी       गुणवत्ता असणाऱ्या कथाकारांना प्रेरणा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गच्या कथा पुरस्कार योजनेत २०२५ चा बाबुराव बागुल कथा पुरस्कार इचलकरंजी येथील कथाकार महावीर कांबळे यांच्या ' मोर्चा' या कथेने प्राप्त केला आहे. समीक्षक प्रा. डॉ.रमेश साळुंखे यांनी परीक्षण केलेल्या या कथा स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील एकूण 70 कथाकार सहभागी झाले होते.   सम्यक संबोधी संस्था वेगवेगळे साहित्यिक उपक्रम राबवत असते.या पार्श्वभूमीवर मराठीतील नव्या उत्तम कथाकाराचा शोध घेण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ लेखक बाबुराव बागुल कथा पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.ही कथा स्पर्धा सर्वांसाठी खुली होती. या कथा स्पर्धेसाठी एकूण ७० कथाकारांनी आपल्या कथा पाठविल्या होत्या. या कथांमधून महावीर कांबळे यांच्या मोर्चा या उत्कृष्ट कथेची बाबुराव बागुल कथा पुरस्कारासाठी निवड कर...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या ' सूर्यभान ' काव्यसंग्रहाचे ८ रोजी प्रकाशन. ॲड. देवदत्त परुळेकर, प्रा.संजीवनी पाटील, प्रसाद घाणेकर, डॉ.मिलिंद कुलकर्णी यांची उपस्थिती. कणकवली /प्रतिनिधी    कणकवलीतील प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ तथा कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या सूर्यभान या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार ८ जून रोजी सायं. ४.३० वा. कसाल कोलते हॉस्पिटलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. प्रभा प्रकाशन आणि डॉ प्रफुल्ल आंबेरकर परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ असून प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी साहित्याच्या अभ्यास प्रा.संजीवनी पाटील, रसिक अग्रणी वाचक प्रसाद घाणेकर आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.    कवी डॉ.डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांचा सूर्यभान हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत असून या संग्रहाला प्रसिद्ध कवी अजय कांडर यांची अभ्यासपूर्ण पाठराखण लाभली आहे...

सिंधुदुर्ग today

इमेज
मृत्यूस कारणीभूत ठरतील अशा गंभीर दुखापती केल्याप्रकरणी संशयीताला सशर्त जामीन संशयितांच्या वतीने अँड उमेश सावंत यांनी पाहिले काम. कणकवली /प्रतिनिधी वैयक्तिक वैमनश्यातून कटरद्वारे सुर्यकांत चंद्रकांत शेडगे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरतील अशा गंभीर दुखापती करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवगड तालुक्यातील जामसंडे तरवाडी येथील दिपक भास्कर शेडगे याला देवगडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एन. बी. घाटगे यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजुर केला आहे. संशयिताच्यावतीने अँड.उमेश सावंत यांनी काम पाहिले. फिर्यादी व आरोपी हे एकाच ठिकाणचे रहिवासी आहेत. फिर्यादीचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्यासाठी लागणारे साहित्य तो आरोपीच्या घराकडे जाण्याच्या वाटेवर ठेवतो, या कारणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमध्ये वाकडीक आहे. दि ७ मे २०२५ रोजी सकाळी ८.३० वा. च्या सुमारास फिर्यादी श्रीराम टेडर्स जामसंडे येथे साहित्य खरेदी करत असताना आरोपी तेथे आला व त्याने माझ्या घराकडील वाटेवरून फेब्रीकेशनचे साहित्य न्यायचे नाही, असे सांगितले. त्यावरून दोघांमध्ये झटापट झाली. आरोपीने खिशातून कटर काढत फिर्यादीच्या...

सिंधुदुर्ग today

इमेज
गोलपिठा काव्य पुरस्कार: प्रत्येकी पाच कविता पाठविण्याचे आवाहन सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गतर्फे गोलपिठा काव्य पुरस्काराचे आयोजन: ३० जून पर्यंत कविता पाठविण्याची अंतिम तारीख कणकवली / प्रतिनिधी        गुणवत्ता असणाऱ्या कवीना प्रेरणा देणारी साहित्य संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करत असलेल्या सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गतर्फे उत्तम कवीचा शोध घेण्यासाठी कविवर्य नामदेव ढसाळ यांच्या बहुचर्चित गोलपिठा काव्यसंग्रहाच्या नावाने काव्य पुरस्कार योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. ही काव्य पुरस्कार योजना सर्वांसाठी खुली असून या पुरस्कार योजनेसाठी प्रत्येक कवीने आपल्या पाच कविता टपलाने किंवा कुरिअरने पाठविणे बंधनकारक आहे. एकूण येणाऱ्या कवितांमधून एका उत्कृष्ट कवीची गोलपिठा काव्य पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. दोन हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ भेट असे पुरस्काराचे स्वरूप असून या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात आलेली नाही. तरी सहभागी होणाऱ्या कवींनी 30 जून २०२५ पर्यंत आपल्या पाच कविता कुरियरने किंवा पोस्टाने खालील पत्त्यावर पाठवाव्यात असे आवाहन स...