सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न 

मुलांना आपले टॅलेंट सिद्ध करावयाचे असे वाटले तर त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणे गरजेचेेचे - प्रा.मोहन कुंभार 

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगाव आणि नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था नांदगाव  तसेच सरस्वती हायस्कूल नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज  मान्यवरांच्या प्रमुुख उपस्थितीत संपन्न झाला. 

       यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात शालांत परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा 

सत्कार करण्यात आला.   सरस्वती हायस्कूल नांदगावच्या सभागृहात  कार्यक्रम आज संपन्न झाला.

       यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोळंब उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये, संस्थेचे खजिनदार सुभाष बिडये प्रमुख  मार्गदर्शक  म्हणून प्रसिद्ध साहित्यिक, संवादक प्रा. मोहन कुंभार, प्रसिद्ध निवेदक  राजेश कदम  ,ज्येष्ठ सल्लागार मनोहर प्रभूखोत,पालक सभेचे सदस्य मारुती मोरये, प्रशालाचे मुख्याध्यापक सुधीर तांबे आदी उपस्थित होते.

          सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शालांत परीक्षेत अनुक्रमे सुयश संपादन केलेल्या यामध्ये प्रथम क्रमांक-निधी प्रकाश सावंत व  सौजन्या संजय घाटकर , व्दितीय- अर्पिता अमोल सावंत ,कैवल्य सागर मिसाळ तृतीय- गायत्री विजयकुमार राठोड , तसेच नांदगाव हायस्कूल मधील प्रथम क्रमांक-ओम राजेश देसाई , द्वितीय-अथर्व अंकुश सदडेकर, तृतीय -नेहा संतोष कदम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

       प्रा.मोहन कुंभार यांनी चालू घडामोडी घटना यांचे दाखले देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालेले आहे. पण काही वर्षानंतर हे विद्यार्थी गायब होतात कुठे? महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा कुठल्याही मोठ्या परीक्षांमध्ये भाग घेताना हे विद्यार्थी दृष्टीस पडत नाहीत. कारण सिंधुदुर्गमध्ये अशा प्रकारचे मार्गदर्शन नाही. परिणाम हे विद्यार्थी कुठेतरी छोट्या मोठ्या नोकऱ्या करतात. आपल्याकडे असलेले टॅलेंट वाया घालवतात. याला जसे पालक जबाबदार आहेत तशी इथली राजकीय आणि शैक्षणिक व्यवस्था ही जबाबदार ठरते.उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था सिंधुदुर्गात नाहीत. शैक्षणिक वातावरण नाही. पुणे मुंबई सारख्या शहरात विद्यार्थी जाऊन उभे राहण्याचा प्रयत्न करतात. जर आपल्या मुलांनी आपले टॅलेंट सिद्ध करावयाचे असे वाटले तर त्यांच्या पाठीशी आर्थिक आणि मानसिक दृष्ट भक्कम उभे राहणे गरजेचेेचे आहे. या सर्वांबरोबरच आपल्या अंगभूत गुणांचाहि विकास करणे तितकेच महत्त्वाचे आहे. शैक्षणिक बौद्धिक मानसिक शारीरिक सामाजिक विकास साधताना आजच्या गळेकापू स्पर्धेमध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही याचीही दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या शैक्षणिक विषयांच्या पलीकडे जाऊन अवांतर वाचनही करावे. हे जग समजून घ्यावे.

तसेच राजेश कदम यांनी देखील आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

       नांदगाव पंचक्रोशी  माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांनी कौशल्य आणि प्रामाणिकपणा जोपासायला हवा असे सांगताना माजी विद्यार्थ्यांची अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले. 

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक  सुधीर तांबे यांनी कार्यक्रमाचे महत्त्व आणि इतिहास याबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन  संजय सावंत यांनी केले त्यांना प्रशालेतील शिस्तबद्ध शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today